
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान
मुंबई, दि. २० (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ३८.७७ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
भिवंडी- 37.06 टक्के
धुळे- 39.97 टक्के
दिंडोरी- 45.95 टक्के
कल्याण – 32.43 टक्के
मुंबई उत्तर – 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के
मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के
मुंबई दक्षिण – 36.64 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के
नाशिक – 39.41 टक्के
पालघर- 42.48 टक्के
ठाणे – 36.07 टक्के