• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साहेबरावदादांचे कामच न्यारे..म्हणूनच साहेबराव दादा सर्वांचे प्यारे..

May 26, 2024

Loading

साहेबरावदादांचे कामच न्यारे..
म्हणूनच साहेबराव दादा सर्वांचे प्यारे..


महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले अमळनेर हे शहर संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजींची कर्मभूमी, संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, श्रीमंत प्रतापशेठ यांची पावनभूमी या नावाने प्रसिद्ध आहे. आता यात नवीन भर म्हणजे मंगळदेव महाराज यांचे दुर्मिळ मंदिर.आता मंगळ नगरी म्हणून अमळनेर शहर खान्देशात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे.अशा पावन नगरीत दरवर्षी चंद्रभागा रुपी बोरी नदी पात्रात परमपूज्य श्रीसंत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो.
अमळनेरच्या राजकीय कारकीर्द पाहता एकमेव असा आमदार या मतदारसंघात लोकांना अनुभवास मिळाला तो म्हणजे मा.आ.कृषिभूषण साहेबराव दादा पाटील. त्यांनी अपक्ष आमदार असतांना सुध्दा अमळनेर शहराचा चेहरामोहरा बदलवला. अमळनेरकरांना सन २००९ पुर्वीचा बोरी नदीवरील जुना पुल शिवाय रहदारीसाठी दुसरा मार्गच नव्हता.तो पुल लहान व कमी उंचीचा होता त्यामूळे वारंवार अपघात व पावसाळ्यात पुर परीस्थीतीत शहराचा व पैलाड भागाचा संपर्क तुटायचा. दादांनी बोरी नदीवर शहरात चार मोठे व उंच पुल बांधलेत. रस्ते दुभाजक व पथदिवे बसवून शहराच्या सौंदर्यात मुंबई -पुणे शहरांप्रमाणे भर घातली.लोकांना आपला परीसर स्वच्छ ठेवणे जमत नाही परंतु दादांनी चक्क बोरी नदीपात्र एखाद्या स्टेडीयम समान स्वच्छ करून दाखवले.बोरी नदी पात्रात पैलाड व वाडी भागाकडे दोन्ही बाजूला पथदिवे व रस्ते तयार केले.
नदीपात्रात शहरातील सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी दादांनी नदीकाठी दोन्ही बाजूला गटारी बांधून नदी स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवले.
आज अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सव पहावयास आलो असता मला गांधलीपुरा येथील कृषिभूषण मार्गापासून वाहनांची पार्किंग दिसली.नंतर बोरी नदीवरील मुख्य पुलावर दुतर्फा बाजूला वाहने पार्किंग दिसली.पैलाड भागातील नदीकाठच्या नवीन रस्त्यावर सुध्दा वाहने पार्किंग दिसली.सखाराम महाराज पुलावर तसेच मंदीर समोरील रस्त्यावर सुध्दा वाहने पार्किंग दिसली. या यात्रेला लाखो भाविक दरवर्षी येतात. जर समजा साहेबराव दादा आमदार झाले नसते तर हे चार पुल निर्माण झाले असते का? जर हे पुल राहीले नसते व समजा सन २००९ पुर्वीचा तो सिंगल जुना पुल राहीला असता तर मग आजची वाहन पार्किंग व रहदारीची परिस्थिती काय राहीली असती? याची आपण जरी कल्पना केली तरी अंगावर अक्षरशः शहारे येतात.
आमदार व खासदार निवडतात व पडतात.काही आमदार व खासदार विकासकामांमुळे जनतेच्या मनात व ह्रदयात कायम स्मरणात राहतात. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील…


मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या विकास कामांना व दुरदृष्टीला अमळनेरकर म्हणून माझा सलाम..


आपलाच,
एक सुज्ञ अमळनेरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *