• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा

Jun 3, 2024

Loading

पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा

शैक्षणिक अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक घुसविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सजग नागरिकांनी हाणून पाडला जग एकविसाव्या शतकाकडे झेपावत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारत याच महाराष्ट्रातील संत परंपरेने धार्मिक जोखड फेकून देत समाजाला शहाणा करण्याचा प्रयत्न केला मात्र याच पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत उत्तर भारताकडून करोडो रुपये बिदागी घेऊन महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या जनतेला कथा महोत्सव भरवून फक्त भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी या भारतभूमीतील धर्मनिरपेक्षता अंगी बाणविलेल्या जनतेच्या मनात धार्मिक तेढ निर्माण होईल विषमता पेरल्या जाईल महिलांविषयीचा दृष्टिकोन मलिन होईल अशा पद्धतीने सांस्कृतिक पेरणी केली आणि महिला वर्गाला देखील खरेखोटेने समजू देता महिलांना एकलोटा जल सब समस्या का हाल त्याही पुढे जाऊन रुद्राक्षाच्या एका गुठळीसाठी अनेकांचे जीव गेले 2023 मे महिन्यात मुख्यमंत्र्यांचा कपाळावरील टिळा ज्या धर्माधिकारी कुटुंबाच्या नावे लावला जातो त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकाच घरात दुसऱ्यांदा देण्याचा घाट घातला 25 लाखाचा पुरस्कार आणि त्या पुरस्काराच्या वितरणासाठी 13 कोटी 53 लाख रुपये खर्ची घालून 17 भक्तगणांची जीव घेतले आणि तरी देखील यांच्या तोंडून ब्र शब्द देखील निघत नाही अथवा त्या भक्तांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देखील मिळाली नाही आणि एवढे कमी म्हणून की काय लोकशिक्षणातून समाज अंधभक्त केलाच मात्र या अंध भक्तांच्या पिढ्या तरुणपणानंतर थोड्या शहाण्या होतात म्हणून बालपणापासूनच यांना धर्माचे बाळकडू पाजण्याचे षडयंत्र या शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घुसळण्याचा यांचा प्रयत्न सुजाण भारतीय नागरिकांनी आणून पाडला त्याबद्दल अल्पसे का असेना समाधान आज मिळाले आहे त्याबद्दल सर्व सज ग नागरिकांचे अभिनंदन मात्र अजूनही खूप मोठा पल्ला गाठणे अजूनही शिल्लक आहे विविध राष्ट्रपुरुषांचे विकृत व्यक्तीचित्रण इतिहासाच्या पानोपानी घुसविलेल्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल संशोधनातून खराखुरा इतिहास काही मोजके अभ्यासक लेखक समाजासमोर आणीत आहेत मात्र या संशोधनाच्या माध्यमातून अभ्यासकांची संख्या वाढणे गरजेचे आहे आज भारत सरकार विज्ञानावरील संशोधनासाठी खर्चाला आखडता हात घेत आहे मात्र मंदिरे तसेच धार्मिक सण उत्सव तेही ठराविक ठिकाणी ठराविक धर्मालाच यातून अतिशय प्रेमाने जगणाऱ्या भारतीय समाजात काही लोकांना भयग्रस्त करण्याचे कारस्थान मात्र करोडो रुपये खर्च करून तेही शासकीय पैशाचा विनीयोग करून या देशाचा मंत्र्यांमधील प्रमुख मंत्री त्याला प्रधानमंत्री म्हणायला हवे मात्र त्यांचे नामकरण देखील पंतप्रधान असे करून तुम्हा आम्हाला अठराव्या शतकाकडे घेऊन जाण्याची मानसिकता आजचे सरकार करीत आहे या देशातील राष्ट्रपती त्यांच्या अधिकाऱ्यांना अथवा प्रतिमेला जाणीवपूर्वक प्रधानमंत्र्याच्या खालचा दर्जा देण्याचा देखील प्रयत्न झाला. राजकारणातील सुचिता नष्ट करून जनतेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करून संविधानिक संस्था पदे अधिकारी यांना सरकारच्या इशाऱ्यावर चुकीचे काम करण्यास बांधील केले जात आहे व खाजगी नोकरांसारख्या नोकरशाहीला राबविले जात आहे आणि म्हणूनच हा शुभ संकेत आहे की मनुस्मृति बाबासाहेबांनी तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांनी तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधी साने गुरुजी आणि त्यांच्यापाठोपाठ साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांनी आज तागायत या सर्व गैर कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील हा अतिशय छोटा विजय मात्र प्रतिकूल परिस्थितीतला हा विजय जनसामान्यांना मोठ्या विजयाकडे घेऊन जाणारा वाटत असेल त्यात नवल ते काय??
संदीप घोरपडे
सामाजिक कार्यकर्ते अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *