• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा – संजय साबळे,शिक्षणाला वय नसतं इच्छा असेल तर माणूस काही पण करू शकतो – राजेश शिरसाठ

Jun 7, 2024

Loading

आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा – संजय साबळे
शिक्षणाला वय नसतं इच्छा असेल तर माणूस काही पण करू शकतो – राजेश शिरसाठ

आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत अग्निशमन दल व सिव्हिल डिफेन्स बाबत मार्गदर्शन !

कल्याण ( मनिलाल शिंपी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत शुक्रवार दिनांक ७/६/२०२४ रोजी
सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री. संजय साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश शिरसाट , महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे उपाध्यक्ष श्री.पितांबर महाजन, खजिनदार श्री.श्याम भालके, अग्निशमन दल प्रमुख श्री.पोहरे, यांनी अग्निशमन दल, सिव्हिल डिफेन्स व आपत्ती व्यवस्थापन याबाबत
Brighton world school,( गुरुकृपा शिक्षणशास्त्र महाविद्यालय) गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन आवळे, आर एस पी ठाणे, नवीमुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,ठाणे,पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.श्री. मनिलाल रतीलाल शिंपी,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे,समादेशक श्री. सिंकंदर शेख आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
शिक्षकांसमोर बोलायचं अवघड काम आहे. कारण शिक्षक आपल्याला घडवत असतात त्यातच तुमच्यासारख्या शिक्षकांनीच आम्हाला घडविले आहे. सुरुवातीपासून आम्हाला एकच शिक्षक होता.आता मात्र शिक्षक प्रत्येक तासाला बदलत असतो. कोणतेही काम असले तरी शिक्षकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात गुणवंत असलेला विद्यार्थी शिक्षकांनीच घडवलेला असतो. आर एस पी मध्ये तुम्हाला हे प्रशिक्षण दिले जात आहे याचा मला आनंद वाटतो कारण हे प्रशिक्षण योग्य ठिकाणी घेतलेले आहे. आमच्यासाठी सुलभ काम करणारे कार्य तुम्ही करणार आहात, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे. जे काय तुम्हाला प्रशिक्षण मिळालेले आहे,त्या प्रशिक्षणाचा तुम्ही तुमच्या संबंधित शिक्षण संस्थेला, शाळेला, महाविद्यालयाला जर काय व्यवस्थित उपयोग करून दिला तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होणार आहे. रस्त्यात वाहतूक कोंडी झाली तर, येणार आणि यावे व जाणाऱ्यांनी जावे. अशा प्रकारचे समाजकार्य तुम्ही करायचा आहे, आठवड्यातून दोन तास आर एस पी साठी, विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम काय आहे व त्याचे पालन कसे करावे एवढे जरी शिकवले तरी पुष्कळ आहे. त्यामध्ये हेल्मेट घालून मोटरसायकल चालवावी, सिग्नल तोडू नये, ट्रिपल सीट बसू नये, ओव्हरटेक करू नये, सिट बेल्ट लावावे,हे जरी शिकवले तरी पुष्कळ. आता रस्ते वाढत नसून संकुचित होत चालले आहेत. त्यामुळे अजून रहदारी वाढते, तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुमच्या कडे जागा असेल तरच तुम्ही घर बांधू शकता,तसेच तुम्हाला जागा नाही तर रोडवर गाडी कशी ठेवू शकता, वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत, या सगळ्या गोष्टी देशाशी निगडित आहेत.
देशाची सुव्यवस्था ठेवणे हे एक प्रकारे चांगले काम आहे. तुमच्या संस्थेमधून शाळेमधून हे काम करावे जेणेकरून पुढच्या भविष्यातील पिढीला
चांगले वळण लागावे व देशामध्ये सुव्यवस्था निर्माण व्हावी हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे यावेळी मार्गदर्शन करतात सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
अनेक धार्मिक उस्तवामध्ये आम्हाला वाहतुक सुरळीत करण्यासाठी आरएसपी ची गरज भासते, त्यामुळे आर एस पी अधिकारी आमच्या बरोबरीने पोलीस मित्र म्हणून काम करतात. आम्ही आहोत तसेच आहोत, मात्र लोकसंख्या दहा पटीने वाढली. म्हणून पोलीस यंत्रणा कमी पडू लागली. आम्हा पोलिसांना एकच काम नाही.तर अनेक कामे आहेत. वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत.त्यातच तुमच्यासारख्या रजा आम्हाला मिळत नाही.त्याला कारण आमच्यावर असलेल्या अनेक जबाबदाऱ्या होय. कारण नोकरी आहे तर सर्व काही आहे, नोकरी नसेल तर जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही.तसेच शिक्षणाला वय नसतं, इच्छा असेल तर माणूस काही पण करू शकतो. ज्याप्रमाणे मी आज एमबीए केले. असे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेश शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी यांनी केले.तसेच सूत्रसंचालन श्री.विनोद शेळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय समादेशक श्री. महादेव क्षीरसागर यांनी केले.
हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे व त्यांची संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed