भाजपा sc st मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांची अमळनेर येथे भेट
दिनांक 3 जुलै रोजी अमळनेर शहराच्या नांदेडकर सभागृहात भारतीय जनता पक्षाचे एससी एसटी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री क्षितीज गायकवाड यांचे उद्बोधन झाले. श्री क्षितीज गायकवाड हे मोठे विचारवंत असुन,त्यांचा संपूर्ण महाराष्ट्र भर संविधान ह्या विषयावर प्रवास सुरू आहे. त्या प्रसंगी ते अमळनेर मधे आले असता त्यांनी सोशल मीडिया influencers, प्राध्यापक, विचारवंतांशी संवाद साधला ह्यात प्रामुख्याने संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या विषयावर चर्चा झाली. संविधानाचे महत्व आणि बाबासाहेबांची व्याप्ती ह्या विषयावर गायकवाड यांनी भर दिला असून विरोधी पक्षांनी कसा संविधाना बद्दल जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मार्गदर्शन केले. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी त्यांच्या सोईनुसार वेळोवेळी संविधानात कसे बदल केले याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संविधानाच्या मुळ ढाच्यात बदल करुच शकत नाही असे असतांना देखील विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याबाबत केलेला हा अपप्रचार म्हणजे जनतेला मुर्ख समजण्याचा सारखे आहे, यावेळी भाजपा शहर अध्यक्ष विजय राजपूत, उमेश वाल्हे ,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष देवा लांडगे , कोषाध्यक्ष अनिल वाणी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस समाधान पाटील,राम कलोसे, मुन्ना कोळी, महेश संदाशिव, महावीर मोरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.