नकाणे व हरण्यामाळ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून तातडीने भरावेत
अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा किमान एक मीटरने यंदा वाढविण्यात यावा – शिवसेना
धुळे प्रतिनिधी
शहराला गेल्या 132 वर्षापासून उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये नकाणे तलावातून पाणीपुरवठा केला जात असतो. पण यंदाच्या वर्षी नकाणे तलाव नैसर्गिक रित्या भरला गेला नाही, अक्कलपाडा प्रकल्पाच्या टेल टॅंक म्हणजेच हरण्यामाळ तलावातून तो अक्कलपाडाचे पाणी हरण्यामाळमध्ये आणून नकाणे तलाव भरून घेणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांनी अक्कलपाडा योजना कार्यान्वित करण्यासाठी नकाने तलाव जाणून बुजून कोरडा ठेवला , त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला धुळे शहराला सामोरे जावे लागले.
यंदाच्या वर्षी जुलै अखेर अक्कलपाडा प्रकल्पाचे मुख्य स्त्रोत असलेले मालनगाव, जामखेली ,लाटीपाडा हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सध्या परिस्थितीत आज मीतीला अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात 625 दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात दरवर्षी 2069 दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवला जातो. प्रकल्पाची क्षमता 3200 दशलक्ष घनफूट इतकी आहे. दरवर्षी 381 मीटर वर हा पाणीसाठा लेवल स्टॉप केला जातो. यंदाच्या वर्षी तिघही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून येणारे पाणी अक्कलपाड्यात जमा होत आहे सद्यस्थितीत अक्कलपाडाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्या इतके पाणी जमा झालेले असून या पाण्यातून उद्यापासून लागलीच एक्सप्रेस कॅनल आणी जम्बो कॅनॉल या दोन्हींमध्ये पाणी सोडून उडाने येथील तीन टेल टॅंक भरून ते पाणी हरण्यामाळ तलावात तातडीने सोडण्यात यावे सध्या हरण्यामाळ तलावात 40 टक्के जलसाठा उपलब्ध असून या नव्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यातून नकाने तलावात पाणी सोडण्यात यावे व नकाने तलाव तातडीने भरून घेण्यात यावा कारण नकाने तलावाच्या वरील बाजूस असलेल्या दह्याने तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने 100 दशलक्ष घनफूट साठा असलेले दह्याने हा लघु प्रकल्प अद्यापही पाण्याअभावी कोरडा आहे हा लघु प्रकल्प भरल्यावरच नकाने तलावात नैसर्गिकरीत्या पाणी येत असते पण यंदाच्या वर्षी अजूनही दोन महिने पावसाळा शिल्लक असताना अतिरिक्त पावसाची वाट न पाहता तातडीने नकाणे तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा, त्यानंतर हरण्यामाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरुन डाव्या कालव्याद्वारे गोंदूर प्रकल्प भरून घेण्यात यावा. नकाणे तलावाची क्षमता 360 दशलक्ष घनफूट असून हरण्यामाळ तलावाची क्षमता 460 दशलक्ष घनफुट इतकी आहे, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्याअगोदर दरवर्षी फेब्रुवारी मार्च एप्रिल या कालावधीत नकाने तलावाचे पाणी अर्ध्या धुळे शहराची तहान भागवत होते. पण गेल्या वर्षी पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधींनी राजकारण करून हे दोन्हीही तलाव अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाण्यातून भरून घेतले नाहीत.
आज मितीस दोन्ही तलावात अत्यंत अल्पसाठा असून तातडीने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून जिल्हाधिकारी महोदयांनी पाटबंधारे विभागाला सूचित करून पाणी सोडण्यासाठी आदेश द्यावेत.
दरवर्षी अक्कलपाडा मध्यम प्रकल्प 381 मीटर पर्यंत भरला जातो यावर्षी तो 382 मीटर पर्यंत भरण्यात यावा जेणेकरून नव्याने एक मीटर जास्तीच्या जलसाठ्याच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील देखील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून घेण्यास मदत होईल तसेच धुळे शहरासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा राखीव साठा देखील मेंटेन ठेवण्यास मदत होईल.
जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसात धुळे तालुक्यातील 30 गावांना अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होऊ शकेल त्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळू शकेल.
तरी महोदय आपण वरील निवेदनाचा गांभीर्याने विचार करून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातू हरण्यामाळ व नकाणे तलाव भरून घ्यावेत अशा आशयाचे निवेदन शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे,मा.आ.प्रा. शरद पाटील , महेश मिस्त्री, किरण जोंधळे, धीरज पाटील डॉ. सुशील महाजन, हेमा ताई हेमाडे, प्रफुल्ल पाटील, देवा लोणारी, भरत मोरे, ललित माळी, आण्णा फुलपगारे, संदीप चव्हाण, प्रवीण साळवे, सुनील पाटील, शरद गोसावी,
संदीप चौधरी, सुनील चौधरी, छोटू माळी ,शिवाजी शिरसाळे, महादू गवळी, दिनेश पाटील, विकास शिंगाडे,काळु गावडे, अरुणा मोरे, नंदा माळी, अमजद पठाण, विष्णू जावडेकर, निलेश कांजरेकर , अमोल ठाकूर सिद्धेश नाशिककर, ईशतियाक आंसरी , लक्ष्मण बोरसे , सागर निकम, हर्षल वाणी, आधी उपस्थित होते
आपला
धीरज पाटील महानगरप्रमुख शिवसेना