शेतकरी नेते सुभाष पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागामध्ये मिळतोय पाठिंबा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नेते सुभाष अण्णा पाटील शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण त्यांच्या प्रश्नासाठी सदैव शासनाची भांडत असतात ..त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत.. शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या असो याच्यासाठी मोठमोठी आंदोलन त्यांनी केलेली आहेत..
शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी जिव्हाळा आहे.. येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे… ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांना विधानसभेमध्ये त्यांनी उमेदवारी करावी अशी चर्चा सध्या तरी ग्रामीण भागामध्ये सुरू आहे…
इंद्रापिंपरी,जानवे येथे गावकऱ्यांशी विधानसभा 2024ह्या विषयावर चर्चा केली ,निवडणूक लढायची ,कशी लढायची या बाबतीत त्यांनी मते मांडली
सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला
गावकऱ्यांचे निस्वार्थ प्रेम बघून उत्साह वाढत आहे..
ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचे प्रेम पाहून मला कामांमध्ये ऊर्जा मिळत असते व शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर मी नेहमी भविष्यातही शासनाशी लढत राहू बोलतांना त्यांनी सांगितले..