शंभर टक्के कर्जवसुली आणि उल्लेखनिय स्वनिधीमुळे मानवधर्म ही एक सुरक्षित पतसंस्था.!
रौप्यमहोत्सवी समारंभात विभागीय सहनिबंधक प्रविण फडणीस यांचे प्रतिपादन!
अकोला…आपल्या पैशांची कुठे,किती आणि कशा प्रकारे गुंतवणूक करावी याबाबतची आर्थिक साक्षरता समाजामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.सहकार क्षेत्रामध्ये ज्या सहकारी बॕंका आणि पतसंस्थाची १०० टक्के कर्जवसुली आणि सभासदांच्या ठेवी एकाच वेळी परत करण्याची आर्थिक क्षमता असणारा उल्लेखनिय स्वनिनिधी असतो त्या सुरक्षित संस्था समजाव्यात.सहकार विभागाच्या या आर्थिक निकषांचे तंतोतंत पालन करून प्रगतीच्या दिशेने जाणारी मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था ही सहकारातील एक सुरक्षित आणि आदर्श पतसंस्था आहे असे प्रतिपादन सहकारी संस्थांचे अमरावती विभागीय सहनिबंधक डॉ.प्रवीणजी फडणीस यांनी केले.सहकारातील सेवेची २५ वर्ष पूर्ण करणाऱ्या सहकार निष्ठ पुरस्कारप्राप्त मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्यमहोत्सवी समारंभ नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमात ते विशेष प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.सभा आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष जानकीरामजी वाकोडे होते.सर्वप्रथम दिप प्रज्वलन,संत गाडगेबाबा,तुकडोजी महाराज व दिवंगत संस्थापक- अध्यक्ष स्वामी शांतानंद सरस्वती यांना वंदन करून अभिवादन करण्यात आले.शहिद जवान, अत्त्याचारग्रस्त महिला, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी तथा रस्ते अपघात व नैसर्गिक आपत्तीमधील बळी आणि दिवंगत सभासद आणि संचालकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.उपस्थित अतिथींचा शाल,स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आले.
स्थानिक हॉटेल सेन्टर प्लाझा येथे झालेल्या या एस.पी.रोडगे विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण), डॉ.प्रविण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक,रविन्द्र जोशी, सेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक,वर्ग-२ या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर विशेष लेखापरीक्षक श्रीकांत देशपांडे,उपाध्यक्ष दिनकर घोरड,सचिव डॉ.रणजीत देशमुख,खजिनदार भास्कर काळे व संचालकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी सहनिबंधक एस.पी.रोडगे यांनी स्व.स्वामी शांतानंद सरस्वती या संतांनी स्थापन केलेली ही संस्था असून नैतिक अधिष्ठाण आणि त्यागातून ही मोठी झालेली आहे.गजगतीने धीर,गंभीर वाटचाल करून सभासदांना सुरक्षितता प्रदान करू शकणारी ही एक मजबूत सहकारी संस्था असल्याचा अभिप्राय लेखापरिक्षणाच्या हवाल्याने दिला.
प्रथम सत्रात संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज पूर्ण करण्यात आले.सचिव डॉ.रणजीत देशमुख यांनी विषय वाचन केले. तर अध्यक्ष जानकी रामजी वाकोडे यांनी दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणातून संस्थेच्या प्रागतिक वाटचालीचा आढावा घेऊन खुमासदार चारोळ्यांनी वातावरण चैतन्यमय केले.पदाधिकारी आणि संचालकांनी विविध विषयांचे वाचन करून हिशोबी लेखेजोखे यावेळी सभासदांसमोर सादर केले.संस्थेच्या आर्थाक प्रगतीमध्ये सहभागी असणाऱ्या आजी माजी संचालकांचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान ,नियमित कर्जदारांना व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ.जया भारती आणि सौ.दिपाली बाहेकर यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला संचालक व माजी अध्यक्ष संजय एम.देशमुख,संचालक सुधीर वाकोडे,माणिकराव सरदार,विजयराव बाहकर, सौ.शोभाताई तेलगोटे,सौ.जयश्री बोचरे,प्रा.विजय काटे,सुरेश तिडके, लेखापरिक्षक समीर साखरे,बहूसंख्य सभासद,व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे,कुंदा पवार विकी क्षिरसागर उपस्थित होते.आभार प्रदर्शन संचालक माणिकराव सरदार यांनी केले.