• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

Oct 3, 2024

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

 

भुसावळ- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे हे होते. सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एस.जी. मेढे व ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. नंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शाळेतील डी. के. भंगाळे, ज्योती शिरतुरे यांनी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जिवनावर ची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांनी अध्यक्षीय मनोगतात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री त्या दोघांचे संपूर्ण जीवन अगदी प्रामाणिकपणा व सेवा करण्यात खर्च झालेले आहे त्यापैकी एक म्हणजे अहिंसेचे पुजारी व देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी. व दुसरे म्हणजे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री.गांधीजीचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या भाषणाने अतिशय प्रेरित होऊन त्याचवेळी सर्व गोष्टींचा त्याग करून महात्मा गांधींना गुरु मानून देश सेवा करण्याची परवानगी मागणारे घरची परिस्थिती अतिशय गरीब असून सुद्धा सच्चाई चे पुढारी व अतिशय प्रामाणिक असे लालबहादूर शास्त्री. व योगायोग असा की या दोन्ही गुरु शिष्यांची जयंती आजच आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले अशा असंख्य देशभक्ता पैकी एक असलेले आणि स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे नेहरू नंतरचे पंतप्रधान पद भूषवलेले देशप्रेमी म्हणजेच लालबहादूर शास्त्री होय.
वाराणसीला उच्च माध्यमिक शाळेत शिकत असताना वयात आल्यावर लालबहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामी मधून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात रुची निर्माण झाली.
भारतात ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राज्यांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निधीमुळे ते महात्मा गांधींच्या भाषणाला अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी ते केवळ सोळा वर्षाचे होते व जेव्हा महात्मा गांधींनी देशवासीयांना सहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले तेव्हा गांधीजींच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणजे शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न असफल ठरले लालबहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहिती होतीकी लालबहादूर शास्त्रींनी एकदा निर्णय घेतला की ते कधीच बदलणार नाहीत कारण बाहेरून मऊ वाटणारे शास्त्रीजी आतून एखाद्या खडकासारखे कणखर होते ते अतिशय प्रामाणिक होते त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से आहेत त्यापैकी एक किसा असा की
त्यांच्याजवळ एक जुना कोट होता त्यांच्या मुलांनी व पत्नीने असा विचार केला की शास्त्रीजींसाठी एक नवीन कोट शिवायचा ठरले.आजूबाजूला एक सुंदर रेषांचा कपडा मागविण्यात आला आणि शिंप्याला बोलावून शास्त्रीजींच्या समोर उभे करण्यात आले.शिंप्याने कोटा ची मापे घेतली व आपल्या डायरीत नोंद केली आणि कोटाच्या कपड्याच्या पाकिटात कापड ठेवून जायला लागला तेव्हा शास्त्रीजींनी त्याला थांबवले व त्याच्या कानात हळूच काहीतरी सांगितले. काही दिवसानंतर जेव्हा तो शिंपी परत आला तेव्हा त्यांच्याजवळ पाकिटात काहीतरी होते व तेव्हा तो शिंपी निघून गेला तेव्हा त्याच्या पुत्रांनी विचारले की बाबूजी काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा शास्त्रींनी असं बोलले की, “अरे अजून तर माझा जुना कोटच चांगला आहे त्यामुळे तो कपडा मी वापस केला व त्याचे पैसे मी गरीब विद्यार्थ्यांना वाटून दिले.”
बघा देशाचा पंतप्रधान परदेशात जात आहे व जुना कोट घालून यावरून त्यांचे राहणीमान किती साधे होते व ते किती काटकसरी होते आणि देशाला मानणारे होते हे त्यांच्या विचारावरून आचारावरून दिसून येते त्यांचे विचारही उच्च प्रतीचे होते.
शास्त्रीजी कायद्याचे पालन अत्यंत तत्परतेने करीत असत एकदा त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला म्हणून ब्रिटिश सरकारच्या नियम प्रमाणे सेनानी लाल बहादुर यांना पकडून तुरुंगात ठेवण्यात आले थोड्या दिवसानंतर त्यांची मुलगी खूपच आजारी आहे अशी बातमी त्यांना तुरुंगात समजली आपल्याला प्यारलवर सोडावे अशी विनंती त्यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना केली तुरुंगाचे अधिकारी शास्त्री जिल्हा मनाला आपल्याला पॅरल वर सोडण्यात काही हरकत नाही पण पॅरल वर असताना आपण कोणत्याच राजकीय कार्यात भाग घेणार नाही हे आपणास लिहून द्यावे लागेल व त्यांना कोरा कागद दिला शास्त्रीजींनी तो कागद घेतला व फाडून फेकून दिला व म्हणाले देशाचा प्रत्येक कायदा पाळणे मी चांगल्या प्रकारे जाणतो पण त्या बरोबर गुलामाप्रमाणे लिहून सुटका करून घेण्याची माझी इच्छा नाही तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना शास्त्रीजींच्या वर्तनाबद्दल पूर्णपणे विश्वास होता म्हणून विनाअट त्यांनी शास्त्रीजींची पॅरल वर सुटका करून घेतली ते घरी आले तेव्हा त्यांना समजले की त्यांची मुलगी थोड्या वेळापूर्वी मरण पावली वडील या नात्याने त्यांनी तिच्या अंतिम संस्कार केले अंतिम संस्कार करून ते स्मशानातून घरी आले व म्हणाले मी आता परत तुरुंगात जायला पाहिजे. घरच्यांनी विचारले पण तुम्हाला तर पंधरा दिवसाची सुट्टी देण्यात आलेली आहे ना? होय शास्त्रीजी म्हणाले पण ही सुट्टी मुलींची देखभाल करण्यासाठी देण्यात आलेली होती आता मुलगीच मरण पावली तर आता अशा सुट्टीची आवश्यकता नाही.एवढे बोलून ते तात्काळ घरातून निघून गेले व तुरुंगात हजर झाले.
शास्त्रीजी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळाल्यावर शास्त्रीजींना सरकारी बंगला देण्यात आलेला होता.त्यात सोपासेट होता हा सोपा त्यांनी भेटायला येणाऱ्या लोकांसाठी एका हॉलमध्ये ठेवलेला होता या सोप्याचे कव्हर घासून घासून पूर्ण फाटून गेले होते ते फाटलेले कव्हर त्यांच्या पत्नी ललिता ताईंना हे आवडत नव्हते सोप्याला नवनवे कव्हर पाहिजे अशा त्या नेहमी त्यांना म्हणत असायच्या.एक दिवस शास्त्रीजी कार्यालयातून परत आले त्यावेळी त्यांच्या पत्नी ललिता देवी त्यांना म्हणाल्या सोप्याचे कव्हर पूर्णपणे फाटलेले आहे हे आपणास माहित आहे का? शास्त्रीजी म्हणाले माहिती आहे.त्यावर ललिता देवी बोलल्या की. ” आपल्या येणाऱ्या लोकांनी इतके फाटलेले कव्हर असलेला सोपा जर पाहिला तर ते आपली काय किंमत करती हे तुम्हाला समजत नाही? ” ” नवीन कव्हर्स बनवण्यासाठी कापड आणायला नको का “,शास्त्रीजी शांतपणे म्हणाले केवळ दिवाण खाण्याची शोभा वाढावी म्हणून मला आता खर्च करणे योग्य वाटत नाही. त्यावर ललिताबाई म्हणाल्या,”कव्हर संपूर्ण फाटलेले आहे ते बनवणे गरजेचे आहे “यावर शास्त्रीजी खुर्चीवर ताडकण उभे राहिले व दाराला लटकत असलेला पडदा खेचून काढला आणि या पडद्यातून कव्हर बनवावे नवीन आणण्याची गरज नाही असे त्यांनी पत्नीला सांगितले.त्यावर त्यांच्या पत्नी म्हणायला की,”दरवाजाजवळ पडले पाहिजेत त्याचे काय दरवाजावर पडद्यांची आवश्यकता नाही शास्त्रीजी” म्हणाले,व पुढे ते म्हणाले ज्याप्रमाणे माझे जीवन उघडे आहे त्याप्रमाणे माझे द्वार पण उघडेच राहील मग पडद्याची आवश्यकता काय ललिता बाईंनी खाली मान घालून त्या पडद्याचे कव्हर बनवले.
भारताचे पंतप्रधान असताना शास्त्रीजी एका साड्यांच्या दुकानात साड्या खरेदी करण्यासाठी गेले दुकानाचा मालक आपल्या दुकानात देशाचे पंतप्रधान शास्त्री जे आलेले आहेत व ते आपल्या दुकानातून साड्या घेत आहेत हे पाहून खूपच खुश झाला व त्याने आपल्या दुकानात शास्त्रीजी आले आहे त्याचे सौभाग्य मानले व त्याचे स्वागत केले तेव्हा शास्त्रीजी त्याला म्हणाले की मला लवकरात लवकर चार-पाच साड्या दे दुकानातला मॅनेजर शास्त्रीजींना एकापेक्षा एक सुंदर भाऊ तुमची साड्या दाखवायला लागला व त्या सर्व उच्च प्रतीच्या साड्या होत्या तेव्हा शास्त्रीजी म्हणाले बाबा मला एवढ्या महाग साड्या नकोस कमी किमतीच्या साड्या दाखवा त्यावर त्या दुकानाचा मालक म्हणाला साहेब या सर्व साड्या आपल्याच आहेत असे समजा पैशांचा प्रश्नच येत नाही हे तर आमचे नशीब की तुम्ही आमच्या दुकानात साड्या घेण्यासाठी आलेला आहात
शास्त्रीजींना त्याचा बोलण्याचा अर्थ लक्षात आला शास्त्रीजी म्हणाली मी पैसे देऊन साड्या घेणार आहे आणि तुला जे सांगतो ते लक्षपूर्वक काही मला अतिशय कमी किमतीच्या साड्या हव्या आहेत तेव्हा त्याने थोड्या स्वस्त किमतीच्या साड्या दाखवायला सुरुवात केली तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, “अरे बाबा, माझ्याजवळ जास्त पैसे नाही आहेत या माझ्यासाठी खूप महाग आहेत
मॅनेजरला अगदी स्वस्थ साडी दाखवायला लाज वाटत होती शास्त्रीजी त्याच्यावर थोडे रागावले म्हणाले की, “दुकानात सर्वात स्वस्त साड्याअसतील तर त्या दाखवा मला त्या घ्यायचे आहेत मला शेवटी मॅनेजर साड्या काढल्या व त्यांना दिल्याआणि शास्त्रीजींनी त्यातल्या काही साड्या घेतल्या व पैसे देऊन निघून गेले त्यांच्या नंतर मात्र त्या दुकानात नोकर साखर शास्त्रीजी साधेपणाबद्दल चर्चा करीत राहिले त्यांनी त्यांचा आदर्श घेतला.
शास्त्रीजींना स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांना आनंदी पाहताना फार आवडत असे एकदा असे झाले की त्यावेळेस शास्त्रीजी रेल्वेमंत्री होते व त्यांनाच मुंबईला जायचे होते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते त्या डब्यात बसणार त्या डब्यात कुलर लावलेला होता गाडी चालू लागल्यावर त्या शास्त्रीजींना डब्यात खूपच थंडी वाजायला लागली ते आपल्या पीएला म्हणाले की डब्यात फारच थंडी आहे व बाहेर तर खूपच उष्णता आहे तेव्हा त्याचे कैलास बाबू म्हणाले की होय आत मध्ये कुलर लावलेला आहे शास्त्रीजींनी आश्चर्य आणि त्याच्याकडे पाहिले व विचारले की कुलर लावलेला आहे? मला न विचारता आपण लोक कोणतेही काम करण्याच्या आधी मला विचारत चला या गाडीत मध्ये जे लोक जास्त आहेत त्यांना गरम होत नसेल का पुढे शास्त्रीजी म्हणाले की मी सुद्धा थर्ड क्लास मध्ये जायला पाहिजे पण जेवढे होत असेल तेवढे करायला पाहिजे फार चुकीची गोष्ट झालेली आहे पुढे गाडी जेथे थांबेल तेथे सर्वप्रथम कुलर काढून टाका आणि पुढे गाडी पुढच्या स्टेशनवर थांबल्यावर शास्त्रीजींनी कुलर काढायला लावला व सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास केला. एक रेल्वेमंत्री असताना सुद्धा त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे प्रवास केला असे होते शास्त्रीजी. असे अनेक किस्से शास्त्रीजींच्या जीवनाबद्दल सांगता येतील.यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली सदर प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या धांडे यांनी तर आभार प्रदर्शन संजिव चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed