*सामाजिक कल्याणासाठी योग्य माणसं निवडण्याची क्रांती घडली पाहिजे….सुगत वाघमारे*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४० वा मासिक विचारमंथन मेळाव्यात दिनदर्शिका प्रकाशन*
*शहिद, महिला,शेतकरी व पत्रकार आप्त व मराठवाड्यातील बळींना श्रध्दांजली..!*
*अकोला* – समाजात मनापासून तळमळीने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी लोकांच्या पाठीशी समाजाने आंतरीक भावनांनी उभं राहिलं पाहिजे.या वाटचालीतील योग्य सेवासाधकांना आपल्या लोकशाहीतील हक्काच्या सामर्थ्याने योग्य जनसेवक म्हणून निवडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी जनतेने पार पाडली पाहिजे.असे प्रतिपादन बाल संरक्षण क्षेत्रातील समाजसेवी, उद्योजक व दै.अजिंक्य भारत व तिक्ष्णगत मिडीयाचे मुख्य संचालक सुगत वाघमारे यांनी केले.पत्रकार महासंघाचा महाराष्ट्र व ईतर राज्य व्याप्ती व नियमित उपक्रमांबध्दल त्यांनी गौरव केला. लोकस्वातंत्र्यचा ४० व्या मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला .याप्रसंगी संघटनेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ सामाजिक सेवाव्रती व माजी पत्रकार प्रा.राजाभाऊ देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रा डॉ.संतोषजी हुशे,ज्येष्ठ पत्रकार,संघटना उपाध्यक्ष प्रदिप खाडे,डॉ.अशोक सिरसाट यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुगत वाघमारे यांच्या कर्तृत्वशाली प्रवासाबध्दल त्यांचा व विशेष कार्यकारी दंडधिकारी नियुक्तीबध्दल डॉ.अशोक सिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.संजय देशमुख यांनी प्रथम प्रास्ताविकातून वाटचाल विषद करतांना लोकस्वातंत्र्यसोबतच नव्या नेर्तृत्वांसाठी सुरू होणाऱ्या नव्या समांतर राजकीय,सामाजिक आघाडीची माहिती यावेळी दिली. प्रा.डॉ. हुशे,कविराज शिवराज जामोदे, व प्रदिप खाडे यांनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी सर्वप्रथम पत्रकार महासंघाचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना वंदन,अभिवादन करण्यात आले. देशातील शहिद जवान,अत्त्याचाग्रस्त महिला, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,आपत्ती बळी, यासोबतच मराठवाड्यातील सोमनाथ सुर्यवंशी व सरपंच संतोष देशमुख या अभागी बळींना तथा स्व.विजय वाकोडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार अंबादास तल्हार यांच्या मातोश्री शांताबाई व पत्रकार दिपक शिरसाट यांच्या पत्नी सौ.सरला सिरसाट यांना सुध्दा श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला केन्द्रीय पदाधिकारी अॕड.राजेश जाधव,सौ.जया भारती,अॕड.नितीन धुत, राज्य पदाधिकारी अरविंद देशमुख, विभागीय पदाधिकारी डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,संदिप देशमुख,संतोष धरमकर,कवी शिवराज जामोदे,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सागर लोडम,मनोहर मोहोड,विजय देशमुख, सौ.दिपाली बाहेकर,विजयराव बाहकर,सुरेश पाचकवडे,अशोककुमार पंडया,अॕड.प्रजानंद उपर्वट,बुढन गायकवाड,योगेश सिरसाट, श्यामराव देशमुख,पि.एन जामोदे,नानासाहेब देशमुख,अनंतराव महल्ले,गौरव देशमुख,देवीदास घोरळ,मनोज देशमुख,सुरेश भारती,सतिश देशमुख (निंबेकर),जगन्नाथ गव्हाळे, डॉ.अशोक तायडे,दिलीप नवले,गजानन मुऱ्हे,ए.बी.देशमुख,शिवचरण डोंगरे, रमेश समुद्रे, वसंतराव देशमुख,धारेराव देशमुख, कैलास टकोरे,दिपक सिरसाट,तुषार हांडे,पांडूरंग आगळे,देवराव सिरसाट,विशाल शिंदे,सौरव सिरसाट,प्रकाश जंजाळ, व अनेक पत्रकार व सामाजिट स्नेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती यांनी तर साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे यांनी आभार प्रदर्शन केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
===========================