• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जळगाव मध्ये पुरोगामी साहित्यिकांची सभा संपन्न !!!

Dec 30, 2024

Loading

जळगाव मध्ये पुरोगामी साहित्यिकांची सभा संपन्न !!!

साहित्य म्हटले की समाजातील अस्तित्वाचा शोध घेणारा‌ प्रवाह होय. साहित्याच्या निर्मिती अनेक लेखक निर्माण झाले. अनेक कवी निर्माण झाले. काही चंद्र, सूर्य याच्या वर्णनाच्या पलीकडे पोहोचले नाही. काही साहित्यिकांनी खऱ्या साहित्याची बाजू मांडली. त्यांच्या साहित्यात वैज्ञानिकता दिसून येते. काही साहित्यिक महापुरुषांच्या सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर सत्याच्या बैठकीवर लिहू लागली. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लिहिण्याची प्रेरणा त्यांना गौतम बुद्धापासून झाली. महात्मा फुले यांना अपेक्षित असलेले विचार समाजात गुरु जावे म्हणून काही साहित्यिकांनी प्रभावी मांडणी केली त्यामध्ये डॉक्टर आ.ह. साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील डॉक्टर यशवंत मनोहर, बाबा आढाव, रावसाहेब कसबे यासारखे लोक दिसून येतात. प्रस्थापित लोक बहुजनांना सोबत न घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवतात परंतु त्यात बहुजनांच्या अस्मिता नसतात. कर्मकांडावर, असत्यावर मांडणी केल्याचे दिसून येते. मोठमोठे पुरस्कारही प्रस्थापित लोकांमधून दिले जातात. प्रवाहाच्या विरुद्ध मांडणारा किती मोठा विद्वान असला तरी त्याला मानाचे स्थान अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळात नसते. आज पर्यंत दिग्गज विचारवंतांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष पद मिळालेले नाही. यावरून ही विशिष्ट लोकांसाठी असलेले मंडळ आहे. अशा विदारक परिस्थितीत बहुजनांच्या मताला प्राधान्य असावे त्यासाठी जळगाव येथे प्राईम पब्लिकेशन हाऊस मध्ये पुरोगामी साहित्यिकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंचावर माजी शिक्षण अधिकारी शशिकांत हिंगोणेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. विचारमंचावर डॉक्टर योगेश महाले, डॉक्टर प्रकाश कांबळे, मा. गणेश काकडे, श्रीमती ज्योती वाघ, आदिवासी लेखक सुनील गायकवाड
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित्र अहिरे यांनी केले. कार्यक्रमात सुरुवातीला मंचावरील व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माननीय सुमित्र अहिरे यांनी प्रास्ताविकात बोलवण्यात आलेल्या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. बहुजनांची 85% संख्या असताना बहुजनांच्या साहित्याला महत्त्व का नाही? आपले साहित्य बहुजनांसाठी निर्माण केले पाहिजे असे स्पष्ट केले. डॉक्टर प्रकाश कांबळे यांनी बहुजन साहित्यिक खूप आहे परंतु ते संघटित नाही. बहुजनातील साहित्य एकत्र आले पाहिजे तरच त्यांना न्याय मिळेल. आपल्या साहित्यात बहुजनांची वेदना आहे त्यामुळे ते जगमान्य आहे. आपल्या बहुजना प्रतिभा लपलेली आहे. खानदेशच्या बहिणाबाई या शिकलेल्या नव्हत्या परंतु त्यांनी आपल्या साहित्यामध्ये बहुजनांचे प्रश्न उपस्थित केले. गाडगेबाबा हे चालता बोलता विद्यापीठ होते. बहुजनांमध्ये प्रतिभा शक्ती असल्यावर त्या प्रतिभेला प्रस्थापित न्याय देत नाही. आज पर्यंत अण्णाभाऊ साठे साध्या विद्वानाला प्रस्थापितांनी महत्व दिले नाही. त्यांना रशियामध्ये महत्त्व प्राप्त झाले. आपल्या बहुजनासाठी आपणच संघटित होऊन साहित्याची निर्मिती केली पाहिजे. गावोगावी जाऊन, समाजा समाजामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. याप्रसंगी प्रकाश कांबळे यांनी अनेक प्रकारचे दाखले देऊन बहुजनांनी केलेल्या साहित्याच्या योगदानाची माहिती दिली. यानंतर आलेल्या अनेक साहित्यिकांनी आपले मत मांडले. त्यात डॉक्टर योगेश महाले, मा.गणेश काकडे, सोपान भवरे, ज्योति वाघ, सुनील गायकवाड, रत्नाकर कोळी, प्राध्यापक तडवी.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत हिंगोणेकर यांनी बहुजनांसाठी लिहिणारे साहित्यिक असंख्य आहेत. मानवतेच्या उभारण्यासाठी जे साहित्यिक मांडणी करतात त्यांचे साहित्य शेवटपर्यंत टिकते. कर्म कांडावर मांडणी करणारे‌ साहित्य खरे साहित्य नाही. तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कबीर, अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेले साहित्य खरे साहित्य आहे. आज प्रस्थापितांकडून साहित्य संमेलन घेतले जाते शासनाचा कोट्यवधी पैसा खर्च होतो परंतु त्यात बहुजनांना स्थान नसते. बहुजनांची व्यथा त्यात मांडलेली नसते. लोकसंख्येच्या 85 टक्के लोकसंख्या बहुजनाचे असताना बहुजनांना साहित्यामध्ये प्राधान्य दिले जाते. विद्रोही साहित्य संमेलन अगदी कमी पैशात पार पडले परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनाला कोट्यावधी रुपये लागले. साहित्यिकांनी ने समाजाची वेदना मांडली पाहिजे. आज अभिव्यक्ती देणाऱ्या संविधानाला पायाखाली तुडवले जात आहे. सविधान हे सर्व धर्मांना जोडून ठेवणारा धागा आहे. संविधानाची शपथ घेतली जाते परंतु संविधान निर्मात्याचा अपमान केला जातो. परभणी मधील घटना दलित विद्यार्थ्याला संविधानाचे रक्षण केले म्हणून कायद्याच्या रक्षण करणार्या कडूनच मारहाण करुन ठार केले गेले.हा प्रकार संविधानावर मोठा प्रहार आहे. आज बहुजन जागृत झालेला आहे. त्याला खरे खोटे सर्व समजते. त्यामुळे त्याला दिशाभूल करण्यासाठी विविध जातिवादाचे, धर्मा धर्मात विषमता निर्माण केली जात आहे.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मूलनिवासी कार्यकर्ता सागर मानले. कार्यक्रमासाठी असंख्य साहित्यिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *