प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर
———————————————-
● वनस्पतीशास्त्र विभागाचा वृक्षारोपण
आणि पथनाट्य कार्यक्रम कपिलेश्वर
संपन्न
● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य
आणि प्रा.जयेश साळवे यांचा सक्रिय
पुढाकार
————————————————-
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलीत, प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने समुदाय सहभाग कार्यक्रम (Community Engagement Programme) आणि पोहोच कार्यक्रमांतर्गत (Outreach Programme) याचा एक संयुक्त वृक्षारोपण उपक्रम, पथनाट्य आणि संवादात्मक कार्यक्रम 23/03/2025 रोजी कपिलेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता.
वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री संदीप बिऱ्हाडे, रेहान मुजावर, प्रा.हर्षदा शिंदे, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.प्रगती पाटील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. द्वितीय वर्ष बी.एस्सी. वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्ष बी.एस्सी. आणि एम.एस्सी. वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त पथनाट्य आणि संवादात्मक कार्यक्रम सादर केले.
प्रस्तुत उपक्रमांअंतर्गत वड, पिंपळ, बेल यांसारख्या औषधी आणि पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, प्रा.पराग पाटील, डॉ.धिरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ. विजय तुंटे, डॉ.अमित पाटील,डॉ.व्ही बी मांटे, प्रा.डॉ.कल्पना पाटील,डॉ.तोरवणे, डॉ.मुकेश भोळे, कुलसचिव श्री. राकेश निळे, लेखापाल श्री.देवेंद्र कांबळे, श्री. भटू चौधरी यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. खान्देश शिक्षण मंडळाच्या संपूर्ण व्यवस्थापनाने या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
“आपल्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने पथनाट्यातून समाजापर्यंत पोहोचवला,” असे प्रा.जयेश साळवे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले.
प्राचार्य डॉ. अरुण जैन म्हणाले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जागरूकता वाढेल आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याची प्रेरणा मिळेल.”
वृक्षारोपण आणि पथनाट्य या दोन्ही माध्यमांतून समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा हा एक अभिनव प्रयत्न ठरला. प्रस्तुत उपक्रमास स्थानिक नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला.