*” साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पोस्ट कार्डवर पत्रलेखनाद्वारे पालकांशी संपर्क “*
अमळनेर प्रतिनिधी
-दिनांक 28 /3 /25 वार शुक्रवार ह्या दिवशी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी भाषे अंतर्गत पत्र लेखन हा उपक्रम राबविला गेला .कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम ह्या होत्या .हिंदी शिक्षक श्री दिलीप पाटील यांनी पोस्ट कार्डद्वारे पत्र लेखन ही संकल्पना विद्यार्थिनींना सांगितली व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या .पोस्ट ऑफिस मधून 150 पत्र आणून विद्यार्थिनींना देण्यात आले व त्यांना समजून सांगितले की पत्र कसे लिहावयाचे आहे .त्याप्रमाणे त्यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना पत्र लिहून दाखवले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम म्हणाल्या की माझ्या चरित्राचा ठेवा माझ्याच हाती असे वरती ब्रिद वाक्य द्या . आजचे युग डिजिटल युग असतांनाही तुम्ही पत्र लिहीत आहात . खूपच आनंदाची गोष्ट आहे तुम्ही असेच लेखन करत रहा म्हणजे तुमचे अक्षर सुंदर होईल कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संदीप घोरपडे म्हणाले की तुम्ही तुमच्या पालकांना पत्र लिहून आपले विचार व्यक्त करत आहात की आम्ही मोबाईलचा वापर अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या वाईट गोष्टींसाठी करणार नाहीत व चुकीच्या रस्त्यावर जाणार नाहीत ही संकल्पना मला खूपच आवडली असून त्यानिमित्ताने तुम्ही हिंदीतून लेखन करत आहात व पत्रलेखन करून पोस्ट कार्डद्वारे आपल्या आई-वडिलांना लिहीत आहात असे चांगले उपक्रम आपल्या शाळेत आपले शिक्षक राबवित असतात ही गोष्ट अभिमानाची आहे कार्यक्रमाला मार्गदर्शन श्रीमती अनिता बोरसे मॅडम व हिंदी शिक्षक श्री दिलीप पाटील यांनी केले . ह्या उपक्रमास संस्थेचेअध्यक्ष माननीय आबासाहेब श्री . हेमकांत पाटील व संस्थेचे संचालक मंडळ यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या .