महिला शेतकऱ्यांनी गाजवला यशाचा झेडा: धरती माता ग्रुपने मिळवला ‘सत्यमेव जयते फार्मर कप’
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :-
पाणी फाउंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरती माता महिला शेतकरी गटाने २०२४ च्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला यांना पन्नास हजार रुपये सन्मानचिन्ह तर शंभू महिला शेतकरी गट खोकरपाट यांना पंचवीस हजार रुपये सन्मानचिन्ह आणि गायत्री महिला शेतकरी गट पातोंडा यांना पंचवीस हजार आणि सन्मानचिन्ह तालुकास्तरीय दुतीय संयुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सुप्रसिद्ध अभिनेते, पाणी फाउंडेशन चे संस्थापक आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशन चे सी. ई. ओ. सत्यजित भटकळ प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, सह्याद्री फार्म चे विलास शिंदे, महाराष्ट्रातील आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष व पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, दीपस्तंभ आणि मनोबल फाउंडेशन चे यजुवेंद्र महाजन, डॉ. रवि महाजन, डॉ. रेखा महाजन पाणी फाउंडेशन टीम चे विभागीय समन्वयक गुणवंत पाटील, तालुका समन्वयक सुनील पाटील, तुषार राऊत आणि इतर अनेक मान्यवर या बरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील १० हजार पेक्षा अधिक महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४३६० गटांचा समावेश होता. तालुक्यातील ८१ गटांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि सक्रिय पने अनेक गटांनी काम केले.
या स्पर्धेत प्रामुख्याने शेतीवर होणारा खर्च कमी करण्याकरिता महाराष्ट्रातील ४ कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने डिजिटल शेती शाळेत आपल्या ज्ञानात वृद्धी करत शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध गटशेती केली.
खरीप हंगामात शेतकर्यांना शेतीसंबधित पडलेला प्रत्येक प्रश्न शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांना विचारला आणि त्याची अंमलबजावणी केली.
या सर्व प्रयत्नामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादनात भरघोस वाढ देखील झाली.
शेतकऱ्यांनी प्रामुख्याने नैसर्गिक कीड व्यवस्थापन केले. यामध्ये निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बायोमिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे सापळे यांचा वापर केला.
गटाने एकमेकांच्या शेतात अडजी पडजी (इर्जिक) ने काम करुन मजुरांच्या मोठ्या समसेवर सहज मात करूण मजुरीच्या खर्चात मोठी बचत केली.
ही सर्व कामे गट करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत रोपांची लागवड, पडणाऱ्या पावसाच्या नोंदी, ग्राम स्वच्छता,एका गटाने दूसर्या गटाला सहकार्य यासारखे सामाजिक कामे देखील गटाने केली. गटाने एकत्र येऊन जिद्दीने चिकाटीने येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर गटातील सर्व सदस्यांनी मिळून एकजूटीने मात केली. या सर्व प्रयत्नांमुळे त्यांना तालुकास्तरीय बक्षीसांपर्यंत मजल मारता आली. त्यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समोर महिला शेतकरी गटांनी एक आदर्श उभा केला आहे.
या गटांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वेगवेगळ्या स्तरातून त्यांच कौतुक होत आहे.