• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे झाले भव्य उद्धघाटन अहिराणी रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

Mar 30, 2025
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0477,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (13, 0);aec_lux: 249.03824;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 36;

Loading

अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे झाले भव्य उद्धघाटन

अहिराणी रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयसभागृहात साहित्य दिंडीने आज पाडव्याच्या शुभ मोहर्तावर पहिल्या दिवशी संमेलनाची सुरवात झाली.
अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय पाचव्या अहिरानी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध लोककवी, लेखक विचारवंत प्रसिद्ध नाट्य कलाकार एकपात्री नाटककार, अहिरानी मिमिक्री यासारख्या विविध रसयुक्त कार्यक्रमांमुळे अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या अहिरानी साहित्य संमेलनाची साहित्यिक, सांस्कृतिक मेजवानी रसिकांना समृद्ध करणारी ठरेल. अमळनेर बळीराजा स्मारकला पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करीत शिरसाळे विदयालयाच्या विद्यार्थ्यांने शिस्तबद्ध लेझीम वर
नुत्य केले.अहिराणी लग्नाच्या रिती व गाणे म्हणत साहित्य प्रेमी बंधू व भगिनी यांनी वाजतगाजत साहित्य दिडी निघाली. व या दिडींत अनेक क्षेत्रातील बांधव भगिनी यांनी दिडींत सहभाग नोंदवला.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी ३० मार्च सायंकाळी ४ वाजता अहिरानी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होईल. सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडीचे आगमन अहिरानी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्यनगरीत झाल्यानंतर होणाऱ्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे , साहित्यिक रमेश सुर्यवंशी,सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत,
मराठी वाड:मय मंडळाचे अध्यक्ष
डॉ अविनाश जोशी, आय ए एस अधिकारी राजेश पाटील, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, डि.डि.पाटील, मा.जिल्हा परिषदेचे सदस्य सौ जयश्री पाटील,साहित्यिक कृष्णा पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष आशोक पाटील ,डॉ बी.एस.पाटील. विचारपिठावर उपस्थित होते.
प्रस्ताविक भगवान पाटील यांनी सांगितले की अहिराणी भाषेची गोडी चांगली आहे. ती भाषा आपल्या मुलांना शिकवली पाहिजे. अहिराणी भाषा कुठे कुठे बोलली जाते ते सांगितले.
साहित्य मंडळाचे उद्घाटक म्हणून अंमळनेर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले.
.उद्घाटन समारंभ नंतर होणाऱ्या काव्य संमेलनात महाराष्ट्रभरात ज्यांची गीते प्रसिद्ध आहेत असे कवी ज्ञानेश्वर भामरे, डॉ.वाल्मिक अहिरे, दादाभाई पिंपळे, रमेश धनगर यासह निमंत्रित कवींची काव्यमैफील रंगली.
रात्री ८ वाजेपासून जात्यावरच्या अहिराणी ओव्या, खानदेशी गाणे, अहिराणी नाटिका,कानबाई नृत्य, अहिराणी मिमिक्री, अहिराणी एकपात्री नाट्य, जात्यावरल्या गाणी व इतर कलाप्रकार यांचा समावेश असलेले खान्देशी सांस्कृतिक कार्यक्रम विविध सांस्कृतिक महिला संघ तसेच वैयक्तिक स्वरूपात राज्यभरातून आलेले कलाकार सादर केले.
अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष प्रा.डी.डी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा.अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे,उपाध्यक्ष डी . ए. पाटील,साहित्यिक समन्वयक डॉ.कुणाल पवार,महिला समन्वयक वसुंधरा लांडगे, सचिव रामेश्वर भदाणेसह अहिराणी साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed