• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डोंबिवली मानपाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. * *दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची साडेतीन तासात सुटका*

Apr 1, 2025

Loading

*डोंबिवली मानपाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.
*
*दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची साडेतीन तासात सुटका*

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)

दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची अवघ्या साडेतीन तासात पोलीसांनी सुटका केली असून याप्रकरणी दोन संशयीतांना ताब्यात घेण्याची कामगिरी मानपाडा पोलीसांनी केली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिजेन्सी अनंतम, डोंबिवली पूर्व येथे राहणारे महेश भोईर यांचा ७ वर्षीय मुलगा सकाळी ७:३० वा. ते ९ वाजण्याच्या दरम्यान रिक्षातून शाळेला जात असताना खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार पोलीसांना सकाळी ९.३० वाजता दिली. खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपींनी पैसे न दिल्यास तसेच पोलीसांना कळविल्यास मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलीसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची ५ वेगवेगळी तपास पथके तयार करुन त्यांना अपहृत मुलाचा शोध घेण्याकरीता आजुबाजुच्या परीसरात रवाना करण्यात आलेले होते.
मानपाडा पोलीसांनी बारकाईने तपास करता अपहृत मुलास शाळेत घेवुन जाणारा रिक्षाचालक विरेन पाटील याचा पोलीसांना संशय आला. त्याअनुषंगाने पोलीसांनी विरेन विषयी तांत्रीक माहिती प्राप्त केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तांत्रीक विश्लेषण करुन विरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढून अवघ्या साडेतीन तासात अपहृत मुलाची शहापुर येथून सुखरुप सुटका केलेली आहे. अपहृत मुलास त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्हयात दोन संशयीतांना ताब्यात घेण्यातं आले असुन इतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे, जयपालसिंह गिरासे, दत्तातत्र गुंड, सहा पो निरीक्षक संपत फड़ोळ, महेश राळेभात, कलगोंडा पाटील, सागर चव्हाण, अभिजीत पाटील, हेमंत डोले, स्वाती जगताप तसेच पोहवा सुनिल पवार, राजेंद खिलारे, बाबा जाधव, संजु मसाळ, शिरीष पाटील, विकास माळी, सचीन साळवी, सुशांत पाटील, पोना यल्लपा पाटील, पोशि वाल्मीक शिंगोटे, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, योगेश आडे, घनःशाम ठाकुर, नाना चव्हाण, गणेश बडे, कृष्णा बोऱ्हाड, गणेश कोठुळे, बालाजी गरुड यांनी पार पाडलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed