अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान आणि बैलांच्या मृत्यूमुळे शेतकरी चिंतेत
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)–
दि. 16 मे 2025 रोजी अमळनेर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः चारा पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली असून, विजेच्या धक्क्याने बैलांची जोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. या नुकसानीमुळे आता पावसाळ्याच्या हंगामात शेतीची मशागत करण्यासाठी बैलांची जोडी कुठून मिळणार या प्रश्नाने शेतकऱ्यांचे मन उदास आहे.
मौजे कन्हेरे येथील शिवारात श्री शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील यांच्या गट क्र. 12/1 मध्ये विजेच्या धक्क्याने बैलांची जोडी मृत्युमुखी पडली आहे. तसेच, मौजे फाफोरे बु येथील शिवारात श्री प्रकाश मोतीराम पाटील यांच्या गट क्र. 369 मध्ये देखील विजेच्या सडेतानीमुळे बैलांची जोडी ठार झाली आहे. या दोन्ही घटनेचा अधिकृत पंचनामा तालुका तलाठी अभिमन्यू जाधव आणि कल्पेश कुंवर यांनी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी ही दुर्घटना दुहेरी धक्का आहे कारण फक्त पिकांचे नुकसान नाही तर श्रमदानातून कमावलेल्या बैलांच्या मृत्यूमुळे शेती कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. भागातील अनेक शेतकरी आताच आर्थिक बोजा सहन करत असून आता बैलांच्या जोडीच्या मुत्यु होण्याने त्यांच्या संकटात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी समाजात दुःख आणि चिंता व्याप्त आहे.
तालुक्यातील विविध भागांत मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या आणि शेतीच्या नुकसानाची तातडीने पंचनामा करण्यात यावा , शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी जोरदारपणे शेतकरी संघटना आणि स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. शेतकरी वर्गाने शासनाकडे यासाठी तत्पर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांच्या सुखद भविष्याकरता शासनाने या आपत्तीग्रस्त भागात जलद पुनर्बांधणीचे प्रयत्न करणे तसेच तातडीने मदतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा शेतकरी आणि स्थानिक समाजाने व्यक्त केली आहे. याशिवाय विजेच्या पुरवठ्यावर अधिक काटेकोर नियंत्रण ठेवण्याची आणि पावसाळ्याच्या काळात आकस्मिक उपाययोजना करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या मोठ्या आर्थिक नुकसानांपासून संरक्षण मिळू शकेल.
ही दुर्घटना शेतकरी वर्गासाठी मोठा धक्का असून, त्यांना संकटातून लवकरात लवकर सावरण्यासाठी प्रशासनाकडून तत्पर कृती होण्याची गरज भासते. यामुळेच तालुका प्रशासन तसेच शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजनांचे सखोल नियोजन सुरु असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांच्या मनोबलाला चालना देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्वरित मदतीची गरज आहे, अन्यथा या संकटाचा प्रभाव पुढील हंगामातही दूर केली जाऊ शकत नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटते.