“कल्याणचा कलाकार अर्जुन ढाकणे यांना पू ल कट्टा संस्थेची भावपूर्ण श्रद्धांजली”
“अर्जुन ढाकणे: नाटक-गझलविश्वातील एका युगपुरुषाला कल्याणमध्ये भावनिक निरोप”
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण येथील अभिनेते, कवी लेखक, गझलकार दिवंगत श्री अर्जुन ढाकणे यांचे नुकतेच अकस्मात अपघाती निधन झाले. अर्जुन ढाकणे हे पू ल कट्टा कल्याण या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्या अनुषंगाने अर्जुन ढाकणे यांच्या गुणांचा जागर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पू ल कट्टा संस्थेने फुल कट्टा वाचनालय नक्षत्र उद्यान कल्याण येथे नुकतेच दिनांक २५/५/२०२५ रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी नाट्य दिग्दर्शक , सिने,नाट्य अभिनेते श्री राम दौंड श्रद्धांजलीपर भाषणात बोलत होते. ते पुढे म्हणाले की अर्जुन ढाकणे हा माझा मित्र होता कविता कशी लिहावी , त्या साठी काय वाचावे याबाबत मला धडे देत होता तेव्हाच तो मी दिग्दर्शन करीत असलेल्या नाटक, एकांकिका मध्ये अभिनय करीत होता. त्यावेळी अभिनय करताना त्याने आपल्यातला कवि कधीच आपल्या अभिनेत्यावर हावी होऊ दिला नाही . ज्यावेळी लाऊड अभिनय करण्याची प्रथा होती पती हळूहळू कमी झाली त्यावेळेस अचूक ढाकणे याचा अभिनंदन सहज आणि नैसर्गिक होता तो जेव्हा काम करीत तो अभिनय करतो की नाही असेच वाटायचे. ती पद्धत आत्ता सध्या अभिनय करताना वापरली जात आहे आपण जसे आहोत तसेच स्टेजवर जाणे व सहज अभिनय करणे ही पद्धत अर्जुन जवळजवळ 35 ते 40 वर्षापूर्वीच वापरीत होता यावरून तो काळाच्या पुढचा अभिनेता होता असे माझे मत आहे असे त्यांनी सांगितले. उपस्थित पू ल कट्टा संयोजक प्रा महेंद्र भावसार ,किशोर खराटे, संजय वाजपेयी , रमेश आव्हाड, ज्योती अय्यर, विजय यांनी अर्जुन ढाकणे यांच्या आठवणी,किस्से सांगून त्यांच्या आरस्पानी या काव्यसंग्रहातील कविता सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सदर वेळी अर्जुन ढाकणे यांची मुले अद्वैत,स्वामी ही उपस्थित होते.सदर वेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजळा देऊन त्यांचा काव्य संग्रह उपस्थिताना भेट दिला.