अपयश हे भविष्य ठरवत नाही – विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक- बालापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचे महत्त्वपूर्ण संदेश
“लोकस्वातंत्र्य विचारमंथन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि प्रेरणा”
अकोला प्रतिनिधी- आयुष्यातला एखादा पराभव किंवा अपयश हे भविष्य ठरवत नसते.हे समजण्याठी विद्यार्थ्यांची युवापिढी ही शैक्षणिक प्रगतीसोबतच भाषा,संवाद आणि सोशलमिडीयाच्या पलिकडे जाऊन मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. असे वातावरण निर्माण करून त्यांना घडवणे ही पालक आणि समाजातल्या थोरा मोठ्यांची जबाबदारी आहे.असे महत्वपूर्ण प्रतिपादन बाळापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ४५ वा मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. याप्रसंगी लोकस्वातंत्र्य सभासदांच्या १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी सुचिताताई पाटेकर जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्यमिक व एस.डी.ओ.बक्षी यांच्या हस्ते प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व दर्जेदार शालेय बॅगा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक प्रा.राजाभाऊ देशमुख व अकोला पंचायत समितीचे डॉ.उल्हास मोकळकर,विस्तार अधिकारी पंचायत हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोक स्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम लोकस्वातंत्र्य सामाजिक अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना वंदन,अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,अत्त्यारचारग्रस्त अश्विनी हगवणे व ईतर महिला, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, आपत्ती व अपघातातील बळी,व दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. तनिष्क देशमुख,यदुराज काटे,ध्रूवेश देशमुख,ययांत देशमुख,सृष्टी लोडम,आकांक्षा अग्रवाल,आर्या देशमुख,धनश्री देशमुख,शरयु पागृत,कृष्णाई देशमुख, दृष्टी इंगोले, या व ईतर विद्यार्थ्या़ंना सन्मानित करण्यात आले.
शिक्षणाधिकारी सुचिताताई पाटेकर यांनी लोकस्वातंत्र्यचे उपक्रम तथा पत्रकार व सामाजिक कल्याणाच्या वाटचालीचा गौरव केला.प्रज्ञावंतांच्या गुणगौरवाप्रमाणेच सामान्य उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी सुध्दा आनंददायी संकल्पना राबविण्याच्या अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केल्या.संघटनाध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी समाज आणि पत्रकार कल्याणाच्या वर्तमान संघर्षाची आणि आगामी उपक्रमांची माहिती देऊन लोक स्वातंत्र्याच्या गोवा राज्य प्रमुख नियुक्तीची कल्पना याप्रसंगी दिली.सौ.सोनल अग्रवाल यांनी त्यांच्याविरूद्ध झालेल्या जादुटोणा षडयंत्र प्रकरणी व त्यांच्या दुसऱ्या सहकारी महिलेला कौटुंबिक छळवणूक घटनेत लोकस्वातंत्र्य कडून झालेल्या मदतीची माहिती दिली. यावेळी उल्हास मोकळकर यांनी संघटन कार्य व वाटचालीची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्यात.
प्रा.महादेव उर्फ देवबाबू लूले यांचे बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे,अॕड.राजेश जाधव,सिध्देश्वर देशमुख,सौ.जया भारती इंगोले,संदिप देशमुख,अॕड.नितीन धुत,संदिप देशमुख,शंकरराव सांगळे,संतोष धरमकार,मनोहर मोहोड,अनिल मावळे,रमेश समुद्रे,सुरेश पाचकवडे,अंबादास तल्हार,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम,शशिकांतराव देशमुख,अॕड.कृष्णराव देशमुख,विजयराव बाहकर,सौ.जयमाला देशमुख,
गजानन कावरे,गजानन ढवळे,आशिष काळे (चांदुर बाजार), के.व्ही.देशमुख,प्रा.विजयराव काटे,आशिष वानखडे पाटील,जयंत देशमुख,सुरेश भारती, मनोज देशमुख,गजानन मुऱ्हे,कृष्णा चव्हाण,डॉ.अशोक सिरसाट,संतोषकुमार गवई,दिपक शर्मा,सतिश देशमुख( विश्व प्रभात),दिलीप नवले,मनोज भगत ( हिवरखेड), धारेराव देशमुख,वसंतराव देशमुख,अशोककुमार पंड्या,नंदश्याम कुकडकर,अजय वाचनाकडे,गौरव देशमुख,कैलास टकोरे,अथर्व देशमुख, दिपक सिरसाट,संघपाल सिरसाठ,जगन्नाथ गव्हाचे, डॉ.अशोक तायडे,तुळशीराम झटाले,अर्जूनराव घुगे, व अनेक पत्रकार उपस्थित होते.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.आभारप्रदर्शन राष्ट्रीय पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले यांनी केले.