*”जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”च्या माध्यमातून “विठ्ठलरुपी बळीराजास” आषाढी एकादशीला मोफत फवारणी पंप चे वाटप*.
जायन्ट्स ग्रुप अमळनेरच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधून तालुक्यातील अल्पभूधारक (२ बिघ्या पेक्षा कमी शेती) तसेच कोरडवाहू शेती,व निर्व्यसनी शेतकरी अशा १० होतकरू शेतकऱ्यांची निवड जायंट्स ग्रूप चे सदस्य ,प्रोजेक्ट चेअरमन ,रविंद्र घनश्याम पाटील व संस्थापक जायंट्स अध्यक्ष सुनील पाटील यांनी केली व त्यांना मोफत कीटकनाशक औषधी फवारणी पंप वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त प्रा. यु जी देशपांडे सर ( जेष्ठ मार्गदर्शक जायन्ट्स ग्रुप अमळनेर),प्रमुख उपस्थिती प्रा. पी. आर भावसार सर व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कर्जत तालुक्याचे बी.डी.ओ (जि. रायगड ) तथा जायन्ट्स ग्रुप अमळनेरचे सदस्य सुशांत आप्पा पाटील व जायन्ट्स ग्रुप अध्यक्ष डॉ सुनील पाटील हे मंचावर उपस्थित होते.
आषाढी एकादशीला संपूर्ण वारकरी समुदाय, शेतकरी, कष्टकरी, पंढरीच्या विठोबाच्या चरणी लीन होतात. आषाढीची वारी प्रत्येकाला च करणे शक्य होतेच असं नाही. म्हणून धडपडणाऱ्या जायन्ट्स ग्रुप च्या सदस्यांनी आपल्या सेवेतच बळीराजाच्या रूपात”विठ्ठल माऊली”आहे हे मानून गरीब,होतकरू, अल्पभूधारक, निर्व्यसनी शेतकऱ्यांची निवड करून त्यांना फवारणीचे पंप वाटप केले. जायन्ट्स ग्रुप साठी बाहेरून कुठलाही आर्थिक निधी अथवा फंड मिळत नाही,पण आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतोच या उदात्त हेतूने प्रत्येक कार्य असो वा सेवा सर्व सदस्य मिळून स्वखर्चाने करत असतात.
फवारणी पंप वाटपामध्ये जे सेवारुपी शेतकरी होते त्यात दिलीप रावण पाटील (ढेकू सिम ),प्रकाश मोहन संदानशिव (पातोंडा ),पंडित रामराव पाटील( सोनखेडी ),भागवत युवराज पाटील ( रामेश्वर ), मुन्ना सर्जेराव पाटील (अमळनेर),विश्वास भटा पाटील (गलवाडे ),दिपक शांताराम पाटील (ढेकू सिम),भरत हिलाल पाटील (कन्हेरे ),
देवराम यशवंत चौधरी ( जळोद),भगवान पांडुरंग सोनवणे (फाफोरे) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.आषाढी एकादशी सारख्या पवित्र दिवसाला आम्हाला शेतकरी बांधवांमध्ये विठुराया बघावयास मिळाला. “अतिथी देवो भव” या उक्तीप्रमाणे ,व वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना , वेफर्स,राजगिरा लाडू , केळी हा उपवासाचा फराळ,चहा पाना सोबत देण्यात आला.
“आपण आम्हाला ज्या भावनेतून फवारणी पंप चे वाटप केले आहेत व तोच लोकसेवेचा निर्धार लक्षात घेऊन आम्हीसुद्धा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनाआमच्याकडून मदत करता येईल, त्या शेतकऱ्यांपर्यंत ही वस्तू सेवा रूपाने पोहोचविण्याचा आम्हीही प्रयत्न करू व आपला वाटपाचा उद्देश निश्चित सफल करूअसा निर्धार जळोद येथील युवा शेतकरी पुत्र देवराम यशवंत चौधरी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून दाखवला.” तसेच सूत्रसंचलन संदीप महाजन सर यांनी करून एक कुशल सूत्रसंचलन करते असल्याचे दाखवून दिले..
हा कार्यक्रम प्रगती कोचिंग क्लासेस, पवन चौक, अमळनेर या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष राजेंद्र भावसार, उपाध्यक्ष डॉ.महेश पाटील, सचिव प्रा संदीप महाजन, खजिनदार राजेंद्र पाटील, अँड राजेंद्र चौधरी, महेश पाटील, रमेश महाजन, , डॉ निलेश शिंगाणे, रवींद्र पाटील, भटू पाटील,संतोष वाघ ,प्रदीप शिंगाणे ,संजय मुंडके, पक्षिमित्र अश्विन पाटील, चंदुलाल बड गुजर सर,प्रो.A.M .Karmpurwalaa, प्रशांत भटू पाटील आदी.जायन्ट्स ग्रुप सदस्य उपस्थित होते.
बळीराजा च्या व ती ने जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर चे खुपखूप आभार मानण्यात आले…