कल्याणेहोळ ता धरणगांव येथे चोरट्यांचा धुमाकूळ
शेतकरी वर्ग त्रस्त..


धरणगाव प्रतिनिधी
कल्याण होळ ता. धरणगांव येथे भुरट्या चोरांचा मोठा धुमाकूळ असून अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील मोटारी व मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. पोलिसांनी लक्ष घालणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की कल्याणेहोळ येथे सुमारे एक वर्षापासून अनेक ठिकाणी घर फोडी केल्या व दुचाकी चोरून नेल्या तसेच 6-11-2022च्या मध्यरात्री ललित व्हनसिंग पाटील व अन्य तीन शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर बँटरी चोरून नेल्या तसेच गुलाबसिंग सुमेरसिंग पाटील उपसरपंच यांची मोटरसायकल घराजवळून चोरून दुचाकी चालु न झाल्याने गावाबाहेर सोडून दिली होती ह्या घटनेला महीना उलट नाही तोच चोरट्यांनी दि 29-11-22 रोजी मध्यरात्री श्री गुलाबसिंग पाटील शेतातील विहीरीतील पाणबुडी व केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.सदर चोरीच्या घटना
वारंवार घटत आहेत.
या घटनांमुळे पाटील परीवार व गावकरी भयभीत झाले आहेत. सदर चोरांचा सखोल तपास करून बंदोबस्त व्हावा व पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्ती करावी अशी मागणी होत आहे.