
समता शिक्षक परिषदेतर्फे सत्यशोधक अरविंद खैरनार पुरस्काराने सन्मानित..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षाच्या पदार्पणात
विशेष राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.
समता शिक्षक परिषदेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.के.अहिरे यांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांना क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले सत्यशोधक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून भटभिक्षुकी यांच्या धार्मिक व आर्थिक पिळवणूकीला पर्याय देऊन प्रतिगामींना धक्का दिला.सत्यशोधक समाजाने इ.स.सन २०२२ – २०२३ मध्ये दीडशेव्या वर्षात पदार्पण केले आहे.या ऐतिहासिक शतकोत्तरी पदार्पण वर्षात समता शिक्षक परिषदेतर्फे राज्यस्तरावर एकमेव पुरस्कार अरविंद खैरनार यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन परिषदेने त्यांनी पुरस्काराने विशेष सन्मान करता आल्याने पुरस्काराचे मोल वर्धिष्णू झाले आहे असे प्रतिपादन प्रा.भरत शिरसाठ यांनी पुरस्कार निवड समिती तर्फे कृतज्ञतापूर्वक स्पष्ट केले.हा पुरस्कार प्रदान करतांना पुरस्कारार्थींएवढाच परमानंद समितीला होत असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.
सत्यशोधकी अरविंद खैरनार यांचे उल्लेखनीय कार्य
संघटनात्मक कार्य : –
- राज्यात एकूण ४ सत्यशोधक समाज संघाचे अधिवेशन नियोजन व मार्गदर्शनाखाली यशस्वी केले. ( १ ) चाळीसगाव – २६ सप्टेंबर २०२१ ( २ ) नंदुरबार – २६ डिसेंबर २०२१ ( ३ ) मुंजवाड ता.सटाणा जि . नाशिक – २६ जून २०२२ ( ४ ) पानाचे कुऱ्हे, ता. भुसावळ, जि जळगाव – ११ डिसेंबर २०२२
- भटभिक्षुकी आणि पुरोहितशाहीच्या धार्मिक शोषणमुक्तीसाठी ” विधीकर्ते प्रशिक्षण शिबीर ” १३ मार्च २०२२ रोजी धरणगाव ( जि .जळगाव ) येथे यशस्वी आयोजन
- सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२३ काढून महाराष्ट्रात १०००० दिनदर्शिकेतून महात्मा फुले यांच्या सत्यशोधकीय चळवळीच्या विधायक व ऐतिहासिक कार्याला उजाळा शैक्षणिक : – औरंगाबाद येथे झोपडपट्टी भागात वंचित व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग त्यात विशेषतः इंग्रजी, गणित, विज्ञान विषयाचे मार्गदर्शन
- सामाजिक :- महाराष्ट्रात विविध शाखांतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन
सांस्कृतिक : -सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून खान्देश व मराठवाड्यात नियोजनबद्ध ” बळी पाडवा ” अभियानातून उत्साहाने साजरा * व्याख्याने : – महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातून महात्मा जोतिराव फुले पुरस्कृत सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा ,विवाह , गृहप्रवेश, वाढदिवस, अन्य आनंदोत्सव, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध कार्यक्रम सर्व समाजाने राबविण्यासाठी प्रबोधनात्मक व्याख्याने - परिवर्तनाने सर्वस्तरातून ऐतिहासिक यशस्वी प्रतिसाद
रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी जळगाव येथे प.न.लुंकड कन्या शाळेत समता शिक्षक परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ परिषदेचे संस्थापक राज्याध्यक्ष डि.के.अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.विचार मंचावर साहित्यिक श्रीपाल सबनीस,आंबेडकर विचारवंत जयसिंग वाघ,प्राध्यापक भरत शिरसाट,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे , डॉ.डी.बी. साळुंखे ,डॉ.चंद्रकांत साळुंखे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील ,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील मान्यवर उपस्थित होते.
अरविंद खैरनार यांना पुरस्कार प्राप्त झाल्याप्रित्यर्थ आमदार शिरीष चौधरी, सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक सचिव डॉ.सुरेश झाल्टे,जयप्रकाश शित्रे, साळूबा पांडव,संजय तांबे, सत्यशोधक सुधाकर बडगुजर,प्रमोद उंबरकर, साहित्यिक जयसिंग वाघ, डॉ.मिलींद बागुल,मुकुंदराव सपकाळे , विधीकर्ते भगवान रोकडे व शिवदास महाजन, पत्रकार ईश्वर महाजन, विश्वासराव पाटील, विजय लुल्हे ,आनंदा सपकाळे,प्रमोद पाटील, लक्ष्मण पाटील, हेमंत माळी सर, पत्रकार कडू महाजन, पत्रकार कमलाकर माळी , पत्रकार योगेश गांधेले ,कविराज पाटील ,धनराज मोतीराय सर यांनी खैरनार यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे .