

आषाढी वारी निमित्ताने सरस्वती शाळेतील मुलांचे पालखी सोहळा आयोजन
उरुळी कांचन: येथे सरस्वती प्राथमिक विद्यालयातील मुलांनी वारकरी पेहराव करून गळ्यात टाळ, मृदंग ,विना, हातात भगव्या पताका घेऊन आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन केले. महान महाराष्ट्राची संत परंपरा जतन करणे , सात्विक प्रवृत्ती वाढावी, चारित्र्याचा विकास व्हावा तसेच शिक्षणाबरोबर अध्यात्मिक वृत्ती जोपासवी म्हणून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कुंजीर सर, वेशभूषा व पालखी सजावट श्रीमती मनीषा मेमाने, कुमारी लीना धिवार , शाळेतील शिक्षक वृंदह्यांनी केले. या पालखी सोहळ्यामध्ये हभप डॉ रविंद्र भोळे उपाध्यक्ष सरस्वती शाळा,पालक वर्ग सौ पाटोळे, श्रीमती शेळके, श्री राजू पेंढारकर तसेच इतर पालक उपस्थित होते.