• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

निवडणूक बॉण्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा-प्रा अशोक पवार

Apr 3, 2024

Loading

निवडणूक बॉण्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा….प्रा अशोक पवार

(निम- ता.अमळनेर)
स्वातंत्र्य मिळवण्यात देशातील सर्व समाजघटकांचा वाटा होता त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले, देशाचे संविधान निर्माण झाले,75 वर्षाच्या संविधानाने या देशाला खूप काही दिले. विविध क्षेत्रातील विकास असेल, सामाजिक परिवर्तन किंवा समतेची भावना वाढणे असेल हे संविधानामुळे शक्य झाले.
आज
लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून होतोय,मणिपूर 77 दिवस जळत राहत,हाथरथ मध्ये बलात्काराची घटना घडते तिचा रात्रीतून अतिमसंस्कार उरकवले जातात हि लक्षण सामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण करणारी तर आहेच त्यांच्या हिताची सुद्धा नक्कीच नाही.
चंदीगड मध्ये महापौरांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अधिकाऱ्यांना हाताशी धरून हवा तो निकाल लावून घेताना यावर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही निवडणूक प्रक्रिया पुनः स्थापित केली गेली. निर्भय बनोच्या कार्यकर्त्याना पुण्यातील भर रस्त्यात ठोकलं जात आणि शासन त्याची साधी दखल सुद्धा घेत नाही.
हि मग्रुरी,सत्तेची नशा आताच उतरवली पाहिजे असे प्रतिपादन गौतम मोरे यांनी केले.

आमचा सुद्धा राम आहे, शिवाजी महाराजांच्या आरमारात अनेक मुस्लिम लढवय्ये होते त्यांचे वकील,हेर, युद्ध सामुग्री बनविणारे मुस्लिम होते आम्हीही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपतींनी हिंदु मुस्लिम अशी दुफळी केली नाही त्यांनी सर्वाना सोबत घेऊन राज्य उभ केलं. तीच आमची खरी परंपरा आहे.
देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लिमांचंही योगदान होत, अनेक क्रांतिकारी घोषणा मुस्लिमांनी तयार केल्यात, राष्ट्रीय ध्वज एका मुस्लिम महिलेच्या संकल्पनेतील परिपाक आहे. महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्यात उस्मान शेख आणि फातिमा शेख बहीण भावच सुद्धा योगदान आहे.असे प्रतिपादन मौलाना रियाज शेख यांनी केले.

निर्भय बनो अभियान अतंर्गत निम ता.अमळनेर येथे सभा संपन्न झाली त्यात
प्रा.अशोक पवार सर यांनी सांगितले की,महागाई की मार खावी लागते आहे .गँस, पेट्रोल, डिझेल, शैक्षणिक साहित्य,अनावश्यक जी.एस.टी.लादला,शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही.गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने महागाई चा उच्चांक गाठला आहे. मुठभर लोकांसाठी सरकार चालू आहे. व्यापारी वर्गासाठी कंपनी चा कर 30% वरून 22% केला .महागाई कमी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. देशाचे आर्थिक सल्लागार श्री. यांच्या अहवालात सांगितले आहे. तरुणांना रोजगार देण्याची गँरंटी नाही.शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गँरंटी नाही. सभेचे आयोजन लोकहिताच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आहे. सर्वसामान्य माणसाला पडलेल्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. यासाठी हि खटाटोप आहे. हे अभियान कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. हे केंद्र सरकार दडपशाही ची वागणूक देत आहे. मतदारांना गृहीत धरू नका ते आपल्याला जागा दाखवतील. लडाख मधील जनतेला आश्वासन दिले ते आश्वासन केंद्र सरकारने पाळले नाही. तेथे आंदोलने सुरू आहेत. जनता उपोषणाला बसली आहे.

निवडणूक रोख्यासाठी कंपनी कायदा बदलला.परदेशी भांडवलदार यांच्या कायद्यात बदल केला.
तोट्यात असलेल्या कंपनी कडून सुध्दा रोखे घेतले.
बॉण्ड चा व्यवहार हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे त्यांनी सांगितले. जी एस टी ने सर्वसामान्य कुटुंबाचं कंबरडे मोडले, खर्चात वाढ झाली मात्र आय मात्र आहे तोच आहे.
या अभियानात प्रा अशोक पवार, गौतम मोरे,मौलाना रियाज शेख हे संपूर्ण परिसरात निर्भय बनो च्या परिवारासह सक्रिय काम करीत आहेत. प्रसंगी सभेचे संयोजक मगन भाऊसाहेब यांनी आभार मानले. विचार मंचावर सभेचे अध्यक्ष अप्पासाहेब केसरसिंग पाटील, मा मगन भाऊसाहेब, डॉ पाटील,चौधरी सर,रमेश भामरे आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *