स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास
प्रा.जयदीप पाटील
दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने तयार केला आहे, त्यातून तुमचा सर्वांगिण विकास होतो. तसेच तुम्हाला शालेय अभ्यास किती कळाला हे त्यातून समजते. तुमच्या मूळ संकल्पना कशा तयार झाल्या आहेत हे समजते. त्या अभ्यासातून तुम्ही एक उत्तम नागरिक बनवण्याचे काम साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय यांच्या माध्यमातून चालविण्यात आलेले स्पर्धा परीक्षा केंद्र करीत आहे असे नोबेल फाउंडेशनचे संचालक प्रा. जयदीप पाटील यांनी सांगितले..
अमळनेर नगरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक,साहित्यिक आर्थिक,अध्यात्मिक योगदान देणारी भूमी आहे. अशा ह्या पवित्र भूमीत पू. सखाराम महाराज, श्रीमंत प्रताप शेठ, पू. साने गुरुजी यांच्या कर्माचा वारसा घेऊन येथील भगिरथ अथक प्रयत्न करित असतात. अशाच दातृत्वाचे उदाहरण म्हणजे साने गुरुजी वाचनालय होय. ह्या वाचनालयात एम. पी. एस. सी, यु. पी. एस.सी व तत्सम शासकिय सेवेच्या यशस्वीतेसाठी दर रविवारी अधिकारी वर्गाच्या मदतीने मोफत मार्गदर्शन चालते यामुळे आतापर्यंत केंद्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी यशस्वी होत आहेत. ह्या स्पर्धा परीक्षा केंद्राचा वर्धापनदिन 8 मे ला असतो. त्यानिमित्त यशस्वी विद्यार्थी सत्कार व अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन व्हावे त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते . यंदा ह्या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कपिल पवार सहआयुक्त आदिवाशी विकास विभाग नाशिक, राजेंद्र खैरनार जिल्हा कोषागार अधिकारी जळगांव, जयदिप पाटील अध्यक्ष नोबेल फांऊडेशन जळगाव, रामचंद्र पाटील,डाॅ.अतुल सूर्यवंशी स्पर्धा परीक्षा मार्गर्शक, डॉ .एस. आर चौधरी निवृत्त प्राचार्य,प्रतीक जैन प्रेसिडेंट रोटरी क्लब, देवेंद्र कोठारी व्हा . प्रेसिडेंट रोटरी क्लब, प्रकाश वाघ चिटणीस सानेगुरुजी ग्रंथालय, सुनील जगताप जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ईश्वर महाजन पत्रकार व संचालक,निलेश पाटील ,दिपक वाल्हे ,सुमित कुलकर्णी संचालक साने गुरुजी ग्रंथालय हे व्यासपिठावर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे हे होते.
याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या उदय सोनार, युनूस पिंजारी, भैय्यासाहेब अहिरराव,विशाल सोनवणे , प्रतिज्ञा लोहार, गणेश पाटील, गणेश पाटील, दामिनी पाटील, दिनेश चौधरी, केतन पाटील, मयूर महाले, वर्षा पाटील, निकिता पाटील, अजय नेतकर , भूषण पाटील योगेश पाटील शिवबा पाटील प्रशांत चित्ते इ.चे सत्कार करण्यात आले. उदय सोनार व विशाल सोनवणे प्रतिज्ञा लोहार ,भूषण पाटील यांनी निवड झाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला केंद्राचे संचालक विजयसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यात आतापर्यंतची स्पर्धा परीक्षा केंद्राची घोडदौड सांगितली. त्याचप्रमाणे मी एकटा नाही तर संपूर्ण टीम माझ्यापाठीमागे आहे. 2016 ला सुरु झालेले हे स्पर्धा परीक्षा केंद्र यशस्वीतेकडे जात आहे. कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वैचारिक मेजवाणी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रामचंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात शिक्षण हे रक्त आहे ते धमण्या धमण्यातून वाहिले पाहिजे. विचारपिठावर बसलेल्या लोकांनी खूप खाचखळगे अनुभवले आहेत.आपणही मेहनत घ्या. मार्गदर्शक हे रामायणातील जांबुवंत सारखे काम करतात. द्वाड मित्र टाळा. सकारात्मक मित्र जोडा. पुस्तके वाचा, चांगली माणसे जोडा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. जिल्हा कोषाधिकारी राजेंद्र खैरनार यांनी बेसिक अभ्यासाकडे लक्ष दिल्यास स्पर्धा परीक्षेत यश लवकर मिळते. आत्म्यविश्वास असेल तर स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडा. डॉ .अतुल सुर्यवंशी यांनीही प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
आदिवासी विकास विभाग नाशिकचे सह आयुक्त कपिल पवार बोलतांना म्हणाले की, मोफत पाणपोई आहे हे माहित आहे परंतू मोफत स्पर्धा केंद्र हे अमळनेरात एकमेव आहे. आपल्याला काय करायचे ते निश्चित करा. अपयश म्हणजे हार नाही. प्रयत्न सोडून देणे हार आहे. समायोजन करायला शिकले पाहिजे. समाज वाचला पाहिजे. अनुभव येऊ दया त्यातून विद्यार्थी प्रगल्भ होतो. आपण संकल्प करु की अदयावत अभ्यासिका, मोबाईल मुक्ती केंद्र, करिअर समस्या सोडविण्यासाठी करिअर दवाखाना सुरु करु या..
नोबेल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयदिप पाटील म्हणाले वाचनालय हा राष्ट्राचा आत्मा आहे. ह्या वाचनालयात जेवढी जीर्ण झालेली पुस्तके अनुभव देतात त्यापेक्षा जास्त अनुभव पोक्त माणसांचे अनुभव देतात. जगण रिअल असावे रिल नसावे. जीवनाचे अंतिम सत्य स्विकारले पाहिजे. श्रीकांत चित्रपटातील श्रीकांत हा नायक यामुळे 11 वी 12वी प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांना सायन्स ला प्रवेश मिळू लागला. माणसे एकत्र आलेली हवी एकत्र आणलेली नाही. आज माणसे एकत्रित आणली जातात. अभय बंग याचे उदाहरण देत देन व्हाट व मृत्यू यामधील जीवन जगता आले पाहीजे. जगाला बुध्दाची गरज आहे. संस्कार नितीमूल्ये हे केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नाही. आनंद मिळविण्यासाठी पैसा लागत नाही. निवडणुकित चांगले अजेंडे दिसत नाही. त्यावरून पुढील भारताची कल्पना येते. यानंतर अध्यक्षीय भाषणात ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी अदयावत अभ्यासिकेसाठी प्रसंगी झोळी फिरवू पण अद्ययावत अभ्यासिका बांधूच अमळनेर हे दानशूर लोकांचे शहर आहे अनेक लोक आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अभ्यासिकेसाठी त्यांनी स्वतः एकतीस हजार रूपये जाहिर केले त्याच प्रमाणे कपिल पवार एकवीस हजार, विकास नारायण ब्रह्मणकर अकरा हजार तर सुनील चौधरी यांनी पाच हजार रूपये जाहीर केले. या कार्यक्रमासाठी विविध खेडयातून विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिटणीस प्रकाश वाघ, माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख, निवृत गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे,एस. एच. भवरे, व्ही एन ब्राह्मणकर, राजेंद्र भावसार,विनोद जाधव ,कैलास पाटील, रविंद्र चव्हाण, सुनिल चौधरी, राजू दादा फापोरेकर, विजय बोरसे,,बापू नगावकर, प्रवीण पाटील, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार , विजय मोरे,युनूस पिंजारी, एम आर पाटील, चंदन पाटील, सतिष कांगणे, दानेश सोनार,मयूर पाटील,नितीन पाटील, ध्रुव जगताप आदित्य पाटील
यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात सुत्रसंचालन मेघा मोरे हिने केले. कार्यक्रमानंतर आभार विजयसिंग पवार यांनी मानले.



