• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धरणगाव शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेना उबाठाचे आंदोलन

May 29, 2024

Loading

धरणगाव शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेना उबाठाचे आंदोलन

पाण्यावर करोडो रुपयांचा चुराडा; गुलाबराव वाघ

धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव: शहरात सध्या भीषण पाणी टंचाई सुरू असून यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमीत शुध्द पाणी पुरवठा करावा यासह शहरातील विविध समस्यांचे निवारण करावे या मागणीसाठी शिवसेना-उबाठा पक्षाने आज धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, धरणगाव शहरामध्ये सध्या अतिशय तीव्र पाणी टंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नगरपालिका गाठली. येथे मुख्याधिकारी नसल्याने या पदाधिकार्‍यांनी ठिय्या मांडून रोष व्यक्त केला आहे. याप्रसंगी पक्षाच्या वतीने मुख्याधिकार्‍यांच्या नावे एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक २८ मे रोजी शहरातील जैन गल्ली येथे नवीन पाईप बसवून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यात थेट व्हाईट हाऊस पासून ते जैन गल्लीपर्यंत आणि परिसरात ज्यांनी नळ घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित पाणी येत नव्हते. ज्यांना थोडेफार पाणी आले ते देखील कमी दाबाने आले. यांसह विविध समस्यांचे तातडीने निराकरण करणे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागात नवीन नळ कनेक्शन घेण्यात आले आहे, त्या भागात पाणी पुरवठ्याच्या दिवशी ठेकेदाराचे कर्मचारी नसतात. यासोबत, शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा हा फिल्टर न करता करण्यात येत असल्यामुळे शहरात डेंग्यू, ताप आदी साथीचे आजार पसरलेले आहेत. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अशुध्द प्रकारातील असून याकडे लक्ष देऊन शुध्द पाणी पुरवठा आणि तो देखील सुरळीतपणे करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, या ठिय्या आंदोलनात शिवसेना-उबाठा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख जयदीप पाटील, हेमंत महाजन परमेश्वर महाजन कृपाराम महाजन, काशिनाथ महाजन, रमेश पांडे, नदीम काझी, संजय पटूने रणजित सिकरवार, माजी नगरसेवक भागवत चौधरी, करीम लाला, जितेंद्र धनगर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सामाजिक नागरिक म्हणून राहुल जैन, राजेंद्र वाघ, गोपाल पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते..

चौकट

पाणीप्रश्न वर करोडो रुपयांचा चुराडा

धरणगाव शहरातील पाईपलाईन योजना ही सुमारे 90 की.मी. असून असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रशासनाने खर्च केला असून जनतेच्या पैसा दुरुपयोग होत आहे पाणीपुरवठा योजना पूर्णतः फेल झाली असून नागरिकांना गेली दोन वर्षांपासून फक्त दररोज पाणी देऊ अशी वलग्ना करणाऱ्या पाणीपुरवठा मंत्री यांनी जबादारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

गुलाबराव वाघ
शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख

जुनीच पाईपलाईन ने पाणीपुरवठा करा
जैन गल्ली येथे नवीन पाईपलाईन पाणीपुरवठा करण्यात आला होता परंतु पाण्याला फोर्स च न नव्हता पहिलेच 12 ते 13 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो नवीन लाईन पेक्षा जुन्याच लाईन वर पाणी द्या

श्री प्रदीप भाटिया
नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *