स्पर्धत ॲपटिट्यूडपेक्षा प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी असायला पाहिजे.
प्रा.धीरज अग्रवाल
(केंद्रीय कॉर्पोरेट संबंध संचालक, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे),
उज्ज्वल भविष्याची दिशा :
अमळनेरमध्ये करियर मार्गदर्शन शिबिर संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
स्वत:शी प्रामाणिकपणं संवाद साधता येणं, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. करिअर घडवण्यासाठी आखलेल्या कल्पनांना योग्य ते प्रारुप दिलं तर ते वास्तवात उतरवण्यासाठीचा आराखडा तयार होतो. यासाठी स्पर्धकाकडं ॲपटिट्यूडपेक्षा प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी असायला पाहिजे. “तुला हे जमणार नाही, तुझा काय अभ्यास आहे, आरशात चेहरा पाहिलास का?” अशा मूल्यमापनांकडं दुर्लक्ष करावं असे
प्रा.धीरज अग्रवाल (केंद्रीय कॉर्पोरेट संबंध संचालक, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे),
अमळनेरला करीयर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते..
अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी मार्गदर्शन मिळाले. दिनांक ४ जुलै २०२४ रोजी नर्मदा रिसॉर्ट, गलवाडे रोड येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवर अतिथी म्हणून
प्रा.धीरज अग्रवाल (केंद्रीय कॉर्पोरेट संबंध संचालक, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे),
डॉ. पुष्पराज वारके (एफ.ई. डीन, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे),मा. प्रा. किरण माळी IKD गणित अकादमी, अमळनेर
आणि एस.डी.देशमुख ( माजी मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर ) उपस्थित होते.
या कार्यक्रमात दोन मुख्य मुद्दयांवर चर्चा झाली. पहिली म्हणजे १२वी नंतरच्या शिक्षण आणि कारकीर्दीच्या पर्यायांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि दुसरी म्हणजे IKD Maths Academy च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करणे. यामध्ये १२वी बोर्ड परीक्षा आणि MHT- CET परीक्षेत त्यांनी केलेल्या यशस्वी निकालांचा समावेश होता.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल सुज्ञ निर्णय घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विविध क्षेत्रातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधींबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच, यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि गुणांवर देखील प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात IKD Maths Academy च्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. एकूण 180 विद्यार्थ्यांना त्यांचा यशाबद्दल गौरवीत करण्यात आले. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या कठोर परिश्रमांसोबतच अकादमीच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा होता, याचे सर्व वक्तांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांच्या भविष्याची दिशा स्पष्ट झाली
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजकांचे सर्वथान कौतुक केले जात आहे. यामुळे अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यास मदत मिळाली.शेवटी मान्यवरांचे प्रा.किरण माळी यांनी आभार व्यक्त केले