• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर तालुक्यातील विद्यामान व माजी आमदार विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाहीत पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष श्याम पाटील यांचा आरोप

Aug 7, 2024

Loading

अमळनेर तालुक्यातील विद्यामान व माजी आमदार विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाहीत

पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार गटाचे शहरअध्यक्ष श्याम पाटील यांचा आरोप

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील नेते सगळे एकत्र आहात आणि तुम्ही या अंमळनेर तालुक्यातील शेतकरी कष्टकरी युवक कार्यकर्ते आणि सर्व मतदारांच्या भावनांची खेळत आहात.. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाहीत असे पत्रकार परिषदेमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी सांगितले..
ते पुढे म्हणाले की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्रित येत नाही, पण तुम्ही या कोर्टाच्या तारखेला एकत्रित आलेत याचा गोडबंगाल काय? तुम्ही पाडळसरे धरणावरती एकत्र आले असते तर आम्ही तुमचे ढोलताशे वाचून स्वागत केले असते.. मा.आमदार शिरीष चौधरी यांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.. त्यांनी कधीही आम्हाला त्याच्यातून निर्दोष मुक्तता करा असे सांगितले नाही हे सर्व परस्पर कसे आताच झाले हा माझा आपल्याला प्रश्न आहे..
माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज जिजाऊ सावित्री यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे मी आपणास जाब विचारू नको ? मी विचारेल कारण त्याचा मला घटनेने अधिकार दिला आहे..
अमळनेर तालुक्याचे आजपर्यंतच्या राजकारणात सगळ्यात मोठे कारण 2016 मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत जेवढे नगरसेवक उमेदवार होते जेवढे राजकीय कार्यकर्ते नेते आणि कार्यकर्ते होते त्याच्यात सगळ्यात जास्त केसेस माझ्यावरती झालेल्या आहेत त्या कार्यकाळामध्ये माझ्यावर तीन गुन्हे दाखल झाले त्यापैकी त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांवर एक जरी गुन्हा दाखल झाला होता का? आणि त्याच्यात माझी कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाली हे तुम्हाला ज्ञात आहे.. तुम्ही सगळे त्या गोष्टीला न्याय देत मला साडेचार महिने बाहेर राहावं लागलं ..दोन महिने नाशिक कारागृहात राहावे लागले आणि मंत्री अनिल पाटील आणि कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे नाव काढण्यासाठी शिरीष चौधरी आणि मंत्री अनिल पाटील सुद्धा कोर्टात
उपस्थितीत राहून आणि साहेबराव पाटील दोन गुन्ह्यांमध्ये माझे दोन्ही भाऊ आहेत..
अमळनेर शहरातल्या तालुक्यातल्या राजकारणातला मी एकमेव असा राजकीय कार्यकर्ता आहे की निवडणुकीच्या कार्यकाळात माझे संपूर्ण कुटुंब खोटा गुनहयात याच्यामध्ये अडकवले गेले.. होतं म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि म्हणून मी अमळनेर तालुक्यातील तरूणांना व सगळ्यांना सावधानतेचा इशारा देत आहे..
मी श्याम पाटील किंवा माझा मित्र परिवार तुमच्यासारखे प्रेम करणारे मित्र मंडळी माझ्यासोबत होते म्हणून मी या सगळ्या अडचणीतून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने सुखरूप निघालो.. परंतु अशी परिस्थिती भविष्यात कुठल्याही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यावरती येऊ नये म्हणून मी हे प्रश्न विचारत आहे.. माझा आरोप आहे 2014 ते 19 शिरीष चौधरी आमदार असतांना साहेबराव पाटील आणि अनिल पाटलांनी त्यांच्याविरुद्ध एखादा आंदोलन मोर्चा किंवा पत्रव्यवहार केला असेल तर त्याचे पुरावे जनतेसमोर आणावे..
2019 तो 24 पाच वर्ष अनिल पाटील आमदार असतांना शिरीषदादा चौधरी यांनी एखादे आंदोलन, एखादा मोर्चा एखादा पत्रव्यवहार केला असेल तर त्याचे पुरावे जनतेसमोर आणावे..
2014 ते 19 अनिल पाटील साहेबराव पाटील यांच्या विरोधात बोलत नाही.. एकमेकांचे विरोधक एकत्र कशे येतात हा माझा प्रश्न आहे..
निवडणूक आली की उमेदवारी करण्याच्या गोष्टी करतात.. कार्यकर्त्यांना इकडून तिकडून बोलण्याचे प्रयत्न करतात.. परंतु मग इतर वेळा कार्यकर्त्यांच्या,शेतकरी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही का बोलत नाही..
2014 ते 19 किंवा राजकीय यांच्यातल्या सगळ्या सहकारी क्षेत्रातल्या असतील किंवा काही निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता परंतु 2019 ते 24 अनिल पाटलांचा जिल्हा बँक निवडणूक झाली दूध संघाची निवडणूक झाली या निवडणुकांमध्ये या निवडणुकीमध्ये त्यांना का विरोध केला या निवडणुकीमध्ये राजकीय कार्यकर्त्याला त्यांचा जिथे न्याय देण्यासाठी प्रयत्न का केले नाही त्यांनी निवडणुका काय तुम्ही आज म्हणतात की मुख्यमंत्री पदाची मला कोणी आँफर दिली तरी मी निवडणूक लढवणार नाही.. तुम्ही या बाकीच्या निवडणुकांमध्ये अनिल पाटील मंत्री असलेल्या महायुतीचा घटक पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या एका माजी पदाधिकाऱ्यांनी म्हणजे शितल देशमुख यांनी पत्रक काढून प्रश्न विचारला होता की आमदारांनी आमसभा घ्यावी.. 19 ते 24 या कार्यकाळात आम्ही पाटलांच्या 2014 ते 19 चौधरी आमदार असताना त्यांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांपैकी 54 कोटी रुपयांची विकास काम अनिल भाईदास पाटलांनी केलेली आहेत असं शिरीष चौधरी यांनीच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते..
पण अमळनेर तालुक्याचे राजकारण सध्या सर्व गोलमाल आहे.. सत्तेसाठी लाचार आणि याच्यात सर्व तरुण व सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे असे श्याम पाटील यांनी सांगितले ते पुढे असे म्हणाले की येणा-या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्यामागे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहू पण असे इकडे-तिकडे जाणाऱ्यांना महाविकास आघाडी साथ देणार नाही असे त्यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *