शिक्षणाच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – संतोष मनुरे.
जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता असलेल्या विविध शासकीय शिष्यवृत्ती व धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री.संतोष मनुरे सर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी तळागळातील पात्र विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यासाठी शासनाने अवलंबलिले धोरण याचे विस्तृत मार्गदर्शन केले. खेड्या-पाड्यातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळेस शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती व वसतीगृहाच्या विविध योजना व त्यासाठी असणारे निकष, पात्रता व लागणारे कागदपत्रके यांचे इत्यंभूत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनेतून शिक्षणाच्या आर्थिक खर्चाची तरतूद असल्याने शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील असते.असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, समिती अध्यक्ष प्रा.डॉ.जयंत इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.दिपक चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ज्योती सोनवणे, प्रा. रुपम निळे, प्रा.संदिप गव्हाळे, प्रा.योगेश धनगर, प्रा. कविता भारुडे, प्रा.विनोद पावरा यांनी परिश्रम घेतले.