अमळनेर दि.२२
ज्ञानगंगा प्रतिष्ठान हे समाजातील विविध कमकुवत घटकांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्याचा शैक्षणिक पाया मजबूत करणे, तरुणांना नोकरी रोजगार मिळावेत म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे ,खेळ,संगीत, स्पर्धा घेऊन गुणवंतांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आरोग्य व इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी काम करणे एकंदरीत समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करण्याचे ज्ञानगंगा प्रतिष्ठानने ठरवले आहे.” असे प्रतिपादन गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठाचे अध्यक्ष पद्माकर पंढरीनाथ देवरे यांनी केले. अमळनेर येथे गुरव समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील विविध शहरातून समाजाचे पदाधिकारी एकत्रित झाले होते.
आज दि२२ ला आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पद्माकर देवरे पुढे म्हणाले की
“समाजाची जास्तीत जास्त परिपूर्ण माहिती व आकडेवारी गोळा करण्याचे काम लवकरच संस्थेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे परंतु सामाजिक हितासाठी व विकासासाठी कार्यकर्त्यांना एकला चलो रे या भावनेतून काम करणे शक्य नाही त्यासाठी चांगल्या साथीदारांची सहकाऱ्यांची आणि समाज हितासाठी झपाटलेल्या बांधवांची गरज आहे.एकजुटीने केलेले कार्य केव्हाही यशस्वी होते आणि असंघटित समूहाने केलेले कार्य अपूर्ण राहते”
या कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्त आर.टी.ओ.सुनील बाबुराव गुरव यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीच्या पूजनाने झाली. संजय मधुकर गुरव यांनी प्रस्तावना केली.
यावेळी धुळे येथील शशिकांत सूर्यवंशी ,मनोज गुरव,भूषण गुरव,रवींद्र गुरव,संतोष गुरव ,सुनील शिंदे,भावेश गुरव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुनील गुरव यांनी आभार मानले
* बैठकीत या विषयांवर चर्चा झाली —
संस्थेच्या कामाविषयी नियोजन करणे, पूर्ण वर्षभराचे कामाचे नियोजन करणे, सर्व पदाधिकारी व सदस्य यांना जबाबदाऱ्या वाटप करणे, गुरव समाज जनगणना” या कामला सुरू करणे
, नवीन येणाऱ्या उपक्रमांबाबत,प्रत्येक जिल्हा व तालुका प्रमाणे प्रतिनिधी नेमणे