• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राज ठाकरे यांचे मराठी कार्ड जाहीरनाम्यात सादर. विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा जाहीर.

Nov 15, 2024

Loading

राज ठाकरे यांचे मराठी कार्ड जाहीरनाम्यात सादर.
विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा जाहीर.

(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला जाहीरनामा मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केला. मी तयार केलेल्या ब्लू प्रिंटवर टीका करण्यात अशी खंत ही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तुम्ही ज्या पक्षाला मत दिले आहे तो लोकप्रतिनिधी आता कुठे आहे? हे बघा. ही जनतेची शुध्द फसवणूक आहे असे राज ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल वक्तव्य केले. महाराष्ट्र विकासाची गोष्ट माझा मनातून जात नाही. शिवरायांच्या गड किल्ल्याचे संवर्धन हे आवश्यक आहे.
विधानसभेचा राज ठाकरेंचा मनसे जाहीरनामा प्रसिद्ध झाला यामध्ये त्यांनी प्रशासन उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषेला महत्त्व देण्याचं प्रतिपादन केले. मराठी भाषेला प्राधान्य मिळावं म्हणूनच मी माझ्या जाहिराती टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा मराठी मध्ये केल्या आहेत.
मुलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला कायदा सुव्यवस्था, आरोग्य क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार, उच्च शिक्षण, औद्योगिक धोरण, प्रशासन आणि मराठीचा सन्मानही जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या बाबी आहेत.

राज्यांमध्ये मराठी भाषेत प्रशासकीय व्यवहार झाला पाहिजे याचा पुर्नउच्चार राज ठाकरे यांनी केला. 17 तारखेला मनसेच्या सभेला अद्याप तरी परवानगी देण्यात आली नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील उद्योगधंद्यामध्ये मराठी मुलांना नोकरीत जागा मिळाल्या पाहिजे या नोकऱ्या राज्यातील स्थानिक लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ही सर्व जबाबदारी शासनाची आहे त्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावसला गेले तेथून करोडो रुपयांचे उद्योग महाराष्ट्रात आणले या उद्योगधंद्याचे काय झाले? गड, किल्ले, मैदानी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. प्रशासनात तसेच शिक्षणात मराठी भाषेचा वापर व्हावा याचा पुनर्विचार राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबई सारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्याची निर्मिती कशी होते? त्याला संरक्षण कोण देत आहे? कारण हा एक व्यवसाय झालाय अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद दिली. झोपडपट्टी पुनर्विकास राज्य सरकार करते आणि त्याचा नफा मात्र बिल्डरला मिळतोय त्या संदर्भात योग्य ते विचार केला पाहिजे. सरकारला खाजगी बिल्डर कशाला हवे?
महाराजांच्या मंदिरापेक्षा विद्येचे मंदिर बांधणे ही काळाची गरज आहे राज्यातील पोलीस खात्याला अनेक गोष्टी माहिती असतात अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. परप्रांतीय व बांगलादेशीय घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका व खाजगी अशा प्रकारे चार प्रकारच्या जमीनीअसतात. अशा वेळी फक्त सरकारच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकामे कशी होतात? या वर अंकुश असणे आवश्यक आहे. आता हे भोंगे पुन्हा सुरू झाले उत्तर प्रदेशात बंद झाले परंतु महाराष्ट्रात पुन्हा सुरू झाले हे असे का होते? देवाची पूजा घरात होत असताना नमाज रस्त्यावरती का? आणि सरकार म्हणून राज्य सरकार यावरती नियंत्रण असते की नाही? असा प्रश्नच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *