अमळनेर रेल्वे अपघातानंतर जलद कार्यवाही; खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने नाश्त्याची खास व्यवस्था
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर रेल्वे स्टेशनवर कोळसा भरलेल्या मालगाडीचे ७ डबे घसरले; खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था
काल अमळनेर रेल्वे स्टेशनवर कोळशाने भरलेल्या मालगाडीचे ७ डबे पट्ट्यांवरून घसरले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर कार्य सुरू केले. रात्रभर मेहनत करून रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व काम पार पाडले आणि रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळवले. या जलद कार्यवाहीमुळे प्रवासी सेवा व मालवाहतूक सेवा लवकर पूर्ववत होऊ शकली.
आज सकाळी या अपघातानंतर रात्रभर अथक मेहनत घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जळगाव लोकसभेच्या कार्यतत्पर व संवेदनशील खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून सर्व कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली. या नाश्त्याचे वाटप भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वयंसेवाभावनेतून केले.
अपघातानंतर तत्काळ कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे सर्वसामान्यांप्रती असलेले जिव्हाळ्याचे आणि सजीव नेतृत्व या उपक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या उपक्रमामुळे कर्मचारीवर्गात उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचितीही मिळाली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जानवे मंडळ अध्यक्ष श्री जिजाबनाना पाटील, शहर मंडलाचे अध्यक्ष योगेश महाजन, खा.शि
संचालक निरज अग्रवाल, श्रीनिवास मोरे,युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे, सरचिटणीस समाधान पाटील, सौरभ पाटील हे उपस्थित होते…