
संविधान दिवस प्रबुद्ध विहारात विचारमंथनाने साजरा!!
संविधान हे उत्तम कायद्याचे ज्ञान असलेले पुस्तक..संविधान हे मानवता उभे करणारे सुत्र आहे. कायदयाचे अदयावत ज्ञान ज्यात आहे तो ग्रंथ म्हणजे संविधान होय. भारत ज्या नियमांवर चालतो, कायदयावर चालतो ते अप्रतिम पुस्तक..अशा सुंदर पुस्तकाची म्हणजेच संविधान निर्मिती झाल्यावर ती सादर करण्याचा दिवस म्हणजेच संविधान दिवस..ह्या दिवसा निमित्त प्रबुद्ध विहारात संविधान दिवस साजरा करण्यात आला. या संविधान दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ. राहुल निकम व निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे होते. सर्वप्रथम तथागत बुध्दाच्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर वक्ते डाॅ. राहुल निकम व शिक्षण विस्तार अधिकारी याच्या मार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक पवार होते. त्यांनी संविधान प्रती चे पुजन केले.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत निकम सर, द.रु. सैंदाणे तसेच गौतम मोरे यांनी केले.
कार्यक्रमात सुरवातीला प्रा. राहुल निकम यांनी विचारपुष्प गुंफले. त्यात त्यांनी संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहिरनामा आहे. संविधान कसे निर्माण झाले. जीवन जगण्याची उत्कृष्ट पद्धत म्हणजे संविधान. डॉ.बाबासाहेबाच्या विद्वत्तेमुळे त्यांची निवड संविधान सभेवर झाली. सामाजिक न्यायासाठी संविधान निर्माण झाले आहे. तुकाराम, कबीर, रैदास यांना अपेक्षित मानवतावादाची संरचना म्हणजे संविधान होय. बाबासाहेबांनी संविधानाच्या रुपात आमहाला अनमोल खजिना दिलेला आहे. कमी दिवसात संविधान कर्त्याने संविधान पूर्ण केले. कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार व्हावी ही अपेक्षा संविधानातून व्यक्त केलेली आहे. परंतू राज्यघटनेचा योग्य वापर होत नाही ही खेदाची बाब आहे. आज जंतर मंतर मैदानात संविधान जाळले गेले परंतू त्यावर विशेष विरोध झाला नाही. आज 74 वर्ष संविधानाला पूर्ण होत आहे तरी संविधानाबाबत पाहिजे तशी जागृती दिसुन येत नाही. यानंतर निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे बोलतांना म्हणाले की, संविधानाने आम्हाला मुलभूत हक्क दिलेत. आजपर्यंत सामाजिक व आर्थिक न्याय सर्वसामान्यांना मिळालेला नाही. 324 कलमानुसार मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. मतदान हा शब्द राज्यघटनेत नाही. आम्हाला मताधिकार दिलेला आहे .समाज देनेवाला निर्माण झाला पाहिजे. राज्यघटना अवश्य वाचली पाहिजे. राज्यघटनेत 11 कर्तव्य दिलेले आहे त्याचे पालन केले पाहिजे. कर्तव्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कलम 13 मध्ये जुन्या रुढी ह्या कलमात शून्य केलेल्या आहे.बाबासाहेब यांनी त्यासाठी मनुस्मृती जाळली. संविधानाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेला हटविले. 1949 रोजी डाॅ बाबासाहेब भाषणात म्हणतात राज्य घटनेची अंमलबजावणी योग्य झाली नाही तर ते संविधान कुचकामी ठरेल. ह्या कार्यक्रमात पत्रकार अजय भामरे यांनी संविधानावर पोवाडा सादर केला.अध्यक्षीय भाषणात अशोक पवार म्हणाले जो राज्यघटनेच्या ह्या विरोधात आहे त्या विरोधात उभे राहिले पाहिजे.स्वातंत्र, न्याय, समता प्रत्येकाने मनात अंगिकारले .संविधानाने महिलांना न मागता स्वातंत्र दिले. माहिती अधिकाराचा कायदा घटनेत नमूद आहे. आज संविधान विरोधी कृती भारतात घडत आहेत.राज्यकर्त्यांकडून राज्यघटनेचा पराभव होत आहे. 3 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झाल्या आहेत. सामान्य माणसासाठी सरकार हे दिसून येते का? हे दिसत नाही. देशात जनजागरण करण्याची गरज आहे.आपले मत व्यक्त केले पाहिजे..बाबासाहेब यांनी खूप सोसले, कष्ट घेतले. वेळेवर जागरुक होण्याची गरज आहे. सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.डी. ए. पाटील यांनी संविधानाच्या उददेश पत्रिकेचे वाचन केले. पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्यात नगरसेवक शाम पाटील, बापुराव संदानशिव, द.रु. सैंदाणे, नगरसेवक बाळासाहेब संदानशिव,अॅड.धिवरे साहेब, निकम सर, पत्रकार बापुराव ठाकरे, पत्रकार एस.एच. भवरे, डी. ए. पाटील, गौतम मोरे, वाघ दादा ,अवसरमल,देवदत्त संदानशिव, सोनवणेदादा,सौ मोरे ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल डोळस यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम मोरे यांनी केले.