• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जीवनाचे सार साध्या सोप्या भाषेत मांडणाऱ्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी

Dec 3, 2023

Loading

जीवनाचे सार साध्या सोप्या भाषेत मांडणाऱ्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्हा म्हटलं की आठवतं जीवनाच्या अथांग सागरात जगतांना नेमक्या कोणत्या गोष्टीचे भान राखले पाहिजे याचे अचूक उत्तर बहिणाबाई च्या कवितेत सापडते..असोदा ह्या सुंदर गावात 24 ऑगस्ट 1880 ला झाला..लेवा बोलीचे प्रभुत्व असलेले हे गाव मातीशी नाड जोडलेले होते. बहिणाबाई चौधरी यांचे वडिल गावातील रूबाबदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे नाव ऊखाजी महाजन होते. स्वभावाने ते शिस्तीचे होते. गावात त्यांचा नैतिक दबदबा होता. गावातील वाद ते लिलया मिटवीत..शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. घरातील सर्वच लोक शेतीत राबायचे..बहिणाबाई च्या माहेरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या चांगली होती..आई भिमाबाई ही कष्टाळू होती. शेतातील सर्व कामे ती सांभाळायची..घरी येणाऱ्या लोकांचे आदरातिथ्य ती करायची..बहिणाबाई यांच्यावर आईवडिलांच्या शिस्तीचा चांगला परिणाम झालेला होता. गावात वारकरी परंपरेचा वारसा होता. आई बरोबर बहिणाबाई किर्तन ऐकायला जायची..गावात हरिनाम सप्ताह दरवर्षी होत होता.बहिणाबाई वडिलांची फार लाडाची मुलगी होती. शिक्षणाची सुरुवात जरी गावागावात झाली होती परंतु मुलींना शिक्षण देणे बहुजन समाजात रूढ झालेले नव्हते..त्यामुळे बहिणाबाई शाळा शिकु शकल्या नाही. गावात होणाऱ्या किर्तन श्रवण करण्याची तसेच मंदिरात होणाऱ्या हरिपाठ, काकड आरती प्रवचने, भारूडे याची आवड बहिणाबाईला आईमुळे लागली होती. झेंडूजी महाराज बेळी संस्थान यांचे येण जाणे ह्या गावात होते. ते वारकरी परंपरेला पुढे नेणारे नशिराबाद जवळील बेळी गाव चे महाराज होते. बहिणाबाई चे लग्न 13 व्या वर्षी नथ्यूजी चौधरी नामक शेतकरी गृहस्थाशी झाले. शेतीत काम करण्याचा अनुभव बहिणाबाईच्या पाठिशी होता. बहिणाबाई चे सासर जळगाव होते. जळगावचे चौधरी कुटुंब हे कष्टकरी कुटुंब होते. चौधरी वाडा त्यावेळी प्रसिध्द होता. अनेक वारकरी परंपरेचे कार्यक्रम तिथे व्हायचे..सारा ज्ळगावातील लेवा समाज शेतीत राबायाचा..जळगावात हळुहळु कारखाने जम धरू लागले होते. परंतू बहूतेक समाज हा शेतीवर उपजीवीका करायचा..बहिणाबाई ची सासरची परिस्थिती हलाखीची होती. बहिणाबाई व पती नथूजी चौधरी शेतीत राबू लागले..बहिणाबाईच्या संसाराच्या वेलीवर ओंकार, सोपान देव व काशी ही कमळे फुलली..सकाळी लवकर ऊठून दळण दळून सकाळची प्रहर उजळायची...बहिणाबाई यांना गीत म्हणायची सवय होती..त्यात त्यांचा आवाज मधुर होता. जात्यावर ओव्या, अभंग, गीते, भारूडे त्या सहज म्हणायच्या...त्यांच्या स्वरचीत गीतांना छान चाल होती. काव्यात गेयता होती. माहेरची श्रीमंतीला सासरचा गरीबी हा उतार झाला होता. बहिणाबाईंनी सासरची नाजूक परिस्थिती असतांना माहेरकडून काहिही मिळण्याची अपेक्षा ठेवली नाही. स्वाभिमान त्यांच्या नसानसात भरला होता. माणुसकी हा त्यांचा धर्म होता. बहिणाबाईंनी असंख्य गीते रचली..ती सर्व त्यांची तोंडपाठ होती. गीताला अभंगाचा ढाचा होता. जीवनात आलेल्या प्रसंगाला लाचार न होता त्या धैर्याने सामोऱ्या गेल्या..जीवन कसे आहे त्याला काय कष्ट घ्यावे लागतात याची सुंदर मांडणी केली आहे..त्या आपल्या कवितेत म्हणतात "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मियते भाकर "

भाकर ही कष्टाशिवाय मिळत नाही. त्यासाठी मेहनत हाच एकमेव मंत्र आहे. संसारासाठी तपावे लागते..हाताला चटके घ्यावे लागतात म्हणजे कष्ट हे पडतात ते येणारच हे कटुसत्य बहिणाबाईने साहित्यात मांडले. मानवाचे मन कसे आहे त्याबद्दल म्हणतात. मन जहरी आहे त्याले कोणतेच मंतर लागु पडत नाही. त्याला चांगल्या विचारात घोळल्यास त्याला वळण लागते..दुसऱ्याच्या कामी येणाऱ्या व्यक्तिस त्यांनी माणूस संबोधले. माणूस हा मानवतेने कसा वागेल हा सवाल त्यांनी कवितेत उपस्थित केला.मन वढाय आहे त्याला रोखता आले पाहिजे असे ते म्हणतात. आज 3 डिसेंबर त्यांची पुण्यतिथी त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!

एस. एच. भवरे
पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *