
आई
तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच…..
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.
26 मार्च 2021 ही आमच्यासाठी एक काळरात्र ठरली… आपले अचानक जाणे आजही आमचा विश्वास बसत नाही…
आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन तिन वर्षे झाली पण दिवस कसे भराभर निघून जातात मनाच्या कप्प्यात आठवणींचा दरवळ मागे ठेऊन ते कळतही नाही. पण एकमात्र खरं प्रसंगानुरूप येतच असते ग तुझी आठवण आणि आतातर जास्तच कारण मधला काही काळ मन तयार नव्हतं म्हणा की सुन्न झाले होते म्हणा; पण तू आता आमच्यासोबत नाही हा विचार मनात पण न फिरकू देण्याचे अविवेकी मन,नाही तर अजून काही -प्रयत्न अज्ञानपणे आम्ही करून बघितले, समजावत राहिलो मनाला की, तू आहेस कोणाच्या तरी घरी आणि आता काही वेळाने फोन करून सांगशील की, दादा मी येतेय तुझ्या घरी,
खूप दिवस झाले नातवंडांना भेटण्यासाठी…. हे आपले शब्द आठवण आली तर निश्चित भावना भरून येतात…
तू कुठेही गेली असेल तुझ्या आजही आठवणी आमच्याकडे जिवंत आहेत… असा एकही दिवस गेला नाही की तुझी आठवण आली नाही मला…
तिन मुले,तिन सुना,नातवंडे, नातचे आईसमोर लग्न झाले…प्रतिकूल परिस्थितीत मात करत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती…. आई खूप आनंदी होती..सगळ्या इच्छा पुर्ण झाल्या आहेत असे नेहमीच म्हणायची…
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल…
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस..
आईंना भावपूर्ण श्रद्धांजली..।
ईश्वर महाजन अमळनेर