• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भारतीय अर्थव्यवस्थेला सावरणारा तारा निखळला !!!

Dec 27, 2024

Loading

भारतीय अर्थव्यवस्थेला सावरणारा तारा निखळला !!!

‌ जगामध्ये अनेक अर्थतज्ञ होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या कौशल्याची थाप जगावर सोडलेली आहे. भारताचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल केले होते. भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये उच्चतम होण्याचे कारण अमर्त्य सेन व मनमोहन सिंग सारखे दिग्गज लोक भारतामध्ये झालेत. अमर्त्य सेन व मनमोहन सिंग यांचा सल्ला विदेशातील पंतप्रधान व राष्ट्रपती घेत असत. ज्या वेळेला जगावर महामंदीचे संकट आले त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना त्यांनी भारताला मंदीच्या सावटातून बाजूला सावरले. भारताची अर्थव्यवस्था अगदी मजबूत करून ठेवली होती. माननीय मनमोहन सिंग यांनी अनेक पदे भूषविली त्यामध्ये गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान, आर्थिक सल्लागार, नियोजन मंडळ अध्यक्ष अशा अनेक पदांना मनमोहन सिंग या बुद्धिवान नेत्याने न्याय दिलेला आहे. पंतप्रधान असताना जर मनमोहन सिंग यांना मनमोकळे स्वातंत्र्य पक्षाकडून मिळाले असते तर अनेक अर्थपूर्ण बदल भारतामध्ये दिसून आले असते. कमी बोलणारे परंतु कृतीतून आपली छाप सोडणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा या विचारवंताचा जन्म सध्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या फाळणीच्या भागांमध्ये म्हणजे पाकिस्तानातील गाह या ठिकाणी झाला. तो दिवस होता 26 सप्टेंबर 1932 . घरच्या अगदी संस्कारशील वातावरणात त्यांचा जन्म झाला. आई-वडिलांची शिस्त अगदी कडक होती. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुमुख कौर तर आईचे नाव अमृत कौर होते. अगदी ‌ प्रामाणिक त्यांचा परिवार होता.त्यांनी अर्थशास्त्राची पदवी पंजाब विद्यापीठातून घेतली. उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात व ऑक्सफर्ड विद्यापीठात गाठले. प्राध्यापकांचे अगदी अर्थशास्त्रामध्ये अतिशय आवड असलेले विद्यार्थी होते. आपल्या बुद्धिमत्तेने प्राध्यापकांना चकित करणारे ते स्कॉलर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आदर्श होते. त्यांच्या पत्नीचे नाव गुरुशरण‌ होते. त्यांना तीन मुली होत्या.बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथावर मनमोहन सिंग यांनी विदेशात मत मांडले. मनमोहनसिंग यांनी अनेक ठिकाणी प्राध्यापक म्हणून नोकरी केली त्यामध्ये पंजाब विद्यापीठ, पंडित जवाहर नेहरु विद्यापीठ यातही अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. सन 1990 -91 या काळात पंतप्रधान कार्यालयात आर्थिक सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. प्रत्येक वंचित, गरीब घटकाला काम मिळावी यासाठी रोजगार हमी योजनेत बदल केले. माणसाला जर काम मिळाले तर तो कुणापुढे लाचार होणार नाही अशी त्यांचे मत होते. अत्यंत मितभाषी, नम्र, विवेकी, तर्कनिष्ठ त्यांचा स्वभाव होता. भारतात खुली अर्थव्यवस्था करण्याचे योगदान त्यांच्याच नावे आहे. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे भारतीय शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आपला माल विदेशापर्यंत पोहोचवून चांगला भाव मिळवता आला. विदेशातून चांगल्या प्रतीचा माल आपल्या देशात मागवता आला. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली. मनमोहन सिंहानंतर खुल्या बाजारपेठेचे अस्तित्व भांडवलदारांच्या ताब्यात गेल्याने शेतकऱ्यांना खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेता आला नाही कारण पुढील आलेले सरकार व्यापारी हिताचा विचार करणारे असल्याने भांडवलदारांच्या हातात खुली अर्थव्यवस्था आली. मनमोहन सिंग यांना अपेक्षित असलेली खुली बाजारपेठ निर्माण झाली नाही. घरी सुबत्ता असलेल्या घरात जन्मलेल्या मनमोहन सिंगांनी गरीब ,वंचित लोकांचा विचार केला. आज अर्थव्यवस्था ‌ पूर्णपणे ढासळलेली आहे. भरमसाठ टॅक्स लावून ‌ जनतेला बेजार केलेले आहे. विशिष्ट व्यापाऱ्यांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य लोकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. खाजगीकरणाच्या नावाने शासकीय कंपन्या विकल्या गेलेले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी व्यापारांच्या ताब्यात देणारे तीन कायदे लागू झाले असते परंतु पंजाब ,हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दीड वर्ष आंदोलन करून ते कायदे सरकारला मागे घ्यायला भाग पाडले. परंतु पुढे तेच कायदे आणून सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी व्यापारांच्या लावणीला बांधतील. सर्वसामान्यांचा विचार करणारा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचे नाव आघाडीवर घेतले जाईल. आज ६० टक्के लोकांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मत मिळण्यासाठी नियमबाह्य आश्वासन देण्याची नीती अर्थव्यवस्था पूर्णपणे नेस्तनाबुत करीत आहे. अशावेळी मनमोहन सिंग सारख्या विचारवंताची गरज आहे. अगदी निष्कलंक, शील संपन्न, विवेकी ,शुध्द व्यक्तिमत्व असलेले मनमोहन सिंग न विसरण्यासारखे आहे.

उपसंपादक
एस.एच.भवरे
लेखनमंच साप्ताहिक अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *