*अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा*
कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे)
आज वयाची ७५ वर्ष आणि लग्नाची ५७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री.आप्पासाहेब ए.जी पाटील आणि सौ कमल पाटील यांच्या अमृत महोत्सव सोहळा सुभेदार वाडा हायस्कूल कल्याण येथे शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. आप्पासाहेब हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आज ७५ वर्षांचे असूनही, तरुणा प्रमाणे सर्व सामाजिक कामामध्ये हिरिरीने सहभाग घेत असतात. त्यांच्या सल्ला व मार्गदर्शन हे सर्वांना मौलिक असतो. या सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कमिटी ने बहारदार गाण्यांनी वातावरण निर्मितीने केली. त्यानंतर श्री जी.आर.पाटील, सौ सुनीता पाटील श्री विकास सर श्री सुनील भाऊ चौधरी यांनी आप्पाच्या कामा विषयी आठवणी सांगितल्या.कौतुक केले .आप्पांचा कामाची वाहवा केली अप्पा हे आजही तरुणांना लाजवेल असे सर्व कामांमध्ये सहभाग घेतात त्यांचे नियोजन परफेक्ट असते त्यांना शंभरी साठी शुभेच्छा दिल्या.शतक महोत्सवच्या सोहळ्या साठी अभिष्टचिंतन केले.आप्पाच्या धर्म पत्नी सौ.कमल पाटील यांनी आप्पा विषयी ५७ वर्ष संसाराचा थोडक्यात आढावा सांगितला. आप्पा सारखे पती मिळाले हे माझे भाग्य आहे त्यामुळे मी सुखात संसार करत आहे.त्यांच्यामुळे मला सर्वत्र मान मिळतो. माझ्या कुंकवाला निरामय व उदंड आयुष्य मिळो अशी परमेश्वरा कडे प्रार्थना केली.यानंतर आप्पांनी ७५ वर्षाच्या थोडक्यात आढावा सांगितला. आप्पा आज सुभेदार वडा कट्टा, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, दोडे गुर्जर मंडळ ठाणे मुंबई विभाग व राहत असलेल्या सोसायटीच्या कमिटी मध्ये कार्यरत आहेत. आप्पांना सामाजिक काम करण्याची आवड आहे. त्यांना शुभेच्छा व अभिष्टचिंतन देऊन पुढील आयुष्यात सुखमय व निरामय जगण्यासाठी नवी ऊर्जा दिली त्यांना पुढील आयुष्य जगण्याच्या आनंद मिळणार आहे.
या कार्यक्रमास नंतर आप्पा व सौ पाटील कमल पाटील यांच्यावर फुलांची उधळण करत सन्मानाने कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यांची गुळा ने तुला करण्यात आली सर्व गुळ उपस्थितांना वाटून गोडवा करण्यात आला.
आप्पा व सौ कमल पाटील यांचा विवाह सुवर्ण महोत्सव निमित्ताने एकमेकांना हार टाकून त्यांचा विवाह लावण्यात आला. यावेळी दोडे गुजर मंडळ महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.शोभा पाटील व सर्व महिला भगिनी व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ महिला आघाडीच्या महिला भगिनी यांनी लग्नाची गाणी व मंगलाष्टके म्हणत लग्न लावण्यात आले.त्याच्यावर फुलांची उधळण केली. ७५ दिवे लावून छान गाण्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली.
आप्पांच्या अमृत महोत्सव साठी दोन दिवस शुभेच्छांचा वर्षाव होतो.वैयक्तिक व व्हाटस अप गृप वरुन शुभेच्छांच्या वर्षाव केला आहे .कार्यक्रम ठिकाणी प्रत्येकांनी सत्कार, सन्मान करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व उपस्थितांचे आभार न मागता त्यांच्या ऋरणाईत राहणार असे आप्पांनी सांगितले. परंतु उपस्थित बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार व समाजसेवक सुनील इंगळे यांनी असे नमूद केले की हा कार्यक्रम आप्पांचां जीवन प्रवाह आहे तो एका जातीत अथवा एका धर्मात जोडू शकत नाही परंतु आपले नेहमीचे सूत्रसंचालक म्हणजे अँकर हे फक्त हा कार्यक्रम अहिराणी लोकांचा आहे असेच दर्शवित असतात परंतु आपल्या आप्पा साहेबांचा जीवन प्रवाह हा सर्व समाविष्ट होता, *त्यांना अहिराणी पुरता मर्यादित* ठेवू नका.
हा आगळा वेगळा अमृत महोत्सव संपन्न झाला त्याबद्दल उपस्थितांनी खरोखरच कार्यक्रमाचा लाभ घेऊन आप्पासाहेबांच्या शतकोत्तर कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवर्जून येणार असे शुभचिंतून शुभेच्छा दिल्यात.