एस. टी. आरक्षण कायदेशिर न्यायालयीन लढ्यासाठी
अमळनेर धनगर समाजाचा तन-मन-धनाने सहभाग

रविवार, दि.29 जानेवारी रोजी अमळनेर व धरणगाव येथे धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई संदर्भात महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच,महाराष्ट्र राज्य मुंबई. जळगाव शाखेच्या वतीने मूळ याचिकाकर्ते प्रबोधन मंचाच्या वतीने उच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षण लढ्याबाबत समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व एकत्रित याचिकांवर पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी मा.न्यायालयाने निश्चित केली आहे. प्रबोधन मंचाच्या याचिकेत कायद्याविषयक प्रश्न उपस्थित केले गेले असल्याने त्या संदर्भात तसा लवकरात लवकर निर्धार करावयाचा असल्याने हस्तक्षेप अर्जकर्ते वनवासी कल्याण आश्रम , आदिवासी समाज कृती समिती ,आदिवासी हक्क संरक्षण कृती समिती यांची पुनरावलोकन याचिका मा.न्यायालयाने फेटाळून लावून त्यांना 6 फेब्रुवारी पर्यंत स्वतंत्र याचिका करण्याचे निर्देश मा.न्यायालयाने दिल्याने धनगर एस टी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे प्रतिपादन मंचाचे राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे व जळगाव शाखेच्या वतीने भिकन पेंढारकर यांनी केले. व समाजाने या कायदेशीर लढाईस तन मन धनाने मदत करण्याच्या बाबतीत आवाहन केले. आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत अमळनेर येथील समाज बांधवानी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली तसेच अमळनेर शहर ,तालुका परिसरातुन 1 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. धरणगाव येथील समाज बांधवांनी देखील तन मन आणि धनाने प्रबोधन मंचास पाठिंबा देणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी अमळनेर येथील डी. ए.धनगर सर, बन्सिलाल अण्णा भागवत सर , एस.सी. तेले सर, रमेश देव शिरसाठ , गोपाल पी. हडपे , प्रा.डॉ विजय शिरसाठ, शशिकांत व्ही. आढावे, रत्नपारखी सर, सचिन देवरे, गौतम लांडगे धरणगाव येथील किशोर अप्पा कंखरे, नगरसेवक जितेंद्र धनगर , पप्पू कंखरे , भूषण धनगर , निखिल धनगर आदी उपस्थित होते.
,